शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

उस्मानाबाद जिल्ह्यात ९२ हजार ग्रामस्थांना ४५ टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:46 PM

ग्रामीण भागातून अधिग्रहण, टँकरचे प्रस्तावही प्रशासनाकडे धडकू लागले आहेत़

ठळक मुद्देअधिग्रहणाची संख्या ३६५ वर

उस्मानाबाद : पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील ३४ गावातील ९२ हजार ७८७ ग्रामस्थांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर २५१ गावांसाठी ३६५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ वाढत्या पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातून अधिग्रहण, टँकरचे प्रस्तावही प्रशासनाकडे धडकू लागले आहेत़

पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे़ प्रकल्प कोरडेठाक पडल्याने गावा-गावाच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत़ त्यात इतर जलस्त्रोतांनीही दम तोडल्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत़ परिणामी प्रशासनाकडे टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ प्रशासनाने सध्या ३४ गावांसाठी ४५ टँकर सुरू केले आहेत़ तर एकूण २५१ गावांसाठी ३६५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यात उस्मानाबाद तालुक्यातील ११ गावांसाठी १८ टँकर सुरू करण्यात आले आहेत़ टँकर भरण्यासाठी १९ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ६६ गावांसाठी १०३ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तुळजापूर ३६ गावांसाठी ६५ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ उमरगा तालुक्यातील एका गावात दोन टँकर सुरू आहेत़ टँकरसाठी २ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ७ गावांसाठी ९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ लोहारा तालुक्यातील २० गावांसाठी २६ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ कळंब तालुक्यातील ७ गावांसाठी ९ टँकर सुरू आहेत़ टँकरसाठी ८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ३८ गावांसाठी ६० विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे

भूम तालुक्यातील ११ गावांसाठी १२ टँकर सुरू करण्यात आले आहेत़ टँकर भरण्यासाठी ८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ७ गावांसाठी ८ अधिग्रहणे तर वाशी तालुक्यातील १३ गावांसाठी १५ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ परंडा तालुक्यातील ४ गावांसाठी ४ टँकर तर हे टँकर भरण्यासाठी ४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ३१ गावांसाठी ३५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ ही परिस्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता भीषण होण्याची शक्यता आहे़

या गावात सुरू आहेत टँकरउस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, उमरगा तालुक्यातील बेळंब, कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा खंडेश्वरी, शेलगाव (ज़), पिंपळगाव (डो़), भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी, गोरमाळा कृष्णपूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, अंतरगाव तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुक्कडगाव आदी गावांना टँकरचा आधार मिळत आहे़

टँकरच्या २८ खेपा कमीजिल्ह्यात सुरू असलेल्या ४५ टँकरच्या १२१ खेपा मंजूर आहेत़ प्रत्यक्षात ९३ खेपा झाल्या असून, २८ खेपा कमी झाल्या आहेत़ गावापासून दूर असलेले अधिग्रहण, अधिग्रहणाचे कमी झालेले पाणी, विजेचा अभाव आदी कारणांमुळे मंजुरीच्या प्रमाणात खेपा होत नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद