शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

बेंगळुरुच्या एमटेक तरुणाची दिल्लीवर चाल; शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पायी भारत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 8:13 PM

farmers protest : शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली.

उस्मानाबाद : अन्नदाता शेतकर्यांवर त्यांच्या हक्कासाठी वर्ष-वर्ष आंदोलन चालविण्याची वेळ येते, हे पाहून व्यथित झालेल्या बेंगळुरुच्या एका उच्चशिक्षित तरुणाने शेतकरीआंदोलनाचा भारतभर जागर घालण्याचा निर्धार करीत पायी यात्रा सुरु केली आहे. मंगळवारी सायंकाळी या तरुणाने चालतच उस्मानाबाद गाठले. यावेळी त्याचा शेतकर्यांसाठी लढणार्या संघटनांनी सन्मान केला.

नागराज कलकुटगर असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे शिक्षण एमटेकपर्यंत झालेले असून, शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली. दररोज २५ किलोमीटर चालून वाटेत भेटणार्या शेतकर्यांमध्ये कायद्याविरुद्ध जागृती करीत तो निघाला आहे. मध्यंतरी दुसरा लॉकडाऊन लागला तेव्हा काही काळ ही यात्रा स्थिगित केली होती. मात्र, ३ जुलैपासून नागराजने चित्रदुर्ग येथून पुन्हा या यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नागराजने उस्मानाबाद गाठले. तेव्हा येथील किसान सभेच्या वतीने सचिव सुदेश इंगळे यांनी त्याचा सन्मान केला. यावेळी लखीमपूर येथील घटनेचा निषेधही करण्यात आला. उस्मानाबादेत मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी नागराजची पदयात्रा पुढे रवाना झाली. यावेळी किसान सभेच्या पदाधिकार्यांसह नागराजला शुभेच्छा दिल्या.

तो जगला तर जग जगेलमागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज तयार करण्याचे काम मागील वर्षभरात झाले. तरीही शेतकरी मागे सरला नाही. सरकारी यंत्रणांची दमनशाही झुगारून हे आंदोलन सुरू ठेवले आहे. माझ्यासारख्या तरुणास हे सगळे पाहून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की आपण देशभर यात्रा करीत लोकांमध्ये जागृती करावी. माझा उद्देश इतकाच आहे की शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला तर जग जगेल. यासाठीच माझा एक छोटा प्रयत्न सुरु आहे.-नागराज कलकुटगर 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद