शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

दुष्काळात 'माणुसकीची पेरणी', 12 वीच्या मुलींसाठी मोफत शिकवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 12:51 PM

कँटीनमध्ये चहा पीताना काही शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून मुलींच्या क्लासेससंदर्भात महत्वाची बाब निरीक्षणात आली.

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब येथील पत्रकार आणि शिक्षकांनी एकत्र येऊन प्रेरणादायी उपक्रमाची पेरणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थींनींसाठी मोफत क्लासेस सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम येथील शिक्षक आणि पत्रकार मंडळींनी सुरू केलंय. या कामी त्यांना गिताई प्रतिष्ठान (माळी नगर) यांची मोलाची साथ मिळाली. सध्या या मोफत क्लासेसचा लाभ 30 ते 35 मुलींना होत असून 5 शिक्षकांकडून विद्यादानाचं काम होत आहे.

क्लासेसच्या नावाखाली एकीकडे गरीब पालकांना आणि विद्यार्थ्यांची मोठा प्रमाणात लुट करण्यात येत आहे. शिकवणीसाठी भरमसाठ फी घेऊन घेऊन शिकांकडून लुबाडणूक करण्यात येत असतानाच कळंब तालुक्यात मुलींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कँटीनमध्ये चहा पीताना काही शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून मुलींच्या क्लासेससंदर्भात महत्वाची बाब निरीक्षणात आली. दुष्काळी परिस्थीतीमुळे शेतकरी अन् गरिबांच्या मुलांना क्लासेसपासून वंचित राहावं लागत असल्याचं निदर्शनास आल्यानं हा उपक्रम सुरू केल्याचं पत्रकार शशिकांत घोंगडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. गिताई प्रतिष्ठान व कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्ताने 12 वी च्या विविध शाखेतील मुलींचे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. यंदाच्या हंगामात 20 टक्केही उत्पन्न मिळालं नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होताना दिसून येतो. तर अनेक मुलीचे विद्यालयीन शिक्षणही बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील मुलींसाठी हे मोफत क्लासेस सुरू केल्याचं घोंगडे यांनी सांगितले. 

बारावी विज्ञान शाखेच्या मुलींना सध्या वर्षभर क्लासेसकरीता 25,000 ते 30,000 रुपये लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना क्लासेस लावणे ही दूरची बाब बनली आहे. या गोष्टीचा विचार करून आणि गिताई प्रतिष्ठान व कळंब तालुका पत्रकार संघ यांनी पुढाकर घेत 12 वी च्या मुलींना एक वर्ष मोफत क्लासेस चालू केले आहेत. हे क्लासेस यु व्ही सायन्स अॅकेडमी व ज्ञानज्योती क्लासेस (मार्केट यार्ड) येथे सुरू करण्यात आले आहेत. या शिकवणी वर्गात 5 शिक्षक विद्यादानाचे मोफत काम करत असून सायन्स, आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थीनी येथे शिक्षण घेत आहेत. सध्या 30-35 मुली येथील मोफत शिकवणी वर्गाचा लाभ घेत आहेत.  यंदाच्या वर्षीपासून हे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले असून 10 दिवसांपूर्वीच क्सासेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच गावातील विश्वजीत ठोंबरे आणि डॉ. रमेश जाधवर यांनी 10 हजार रुपयांचे रजिस्टर या गरीब, गरजू आण होतकरू विद्यार्थीनींसाठी वाटप केले. कळंबसारख्या तालुक्यास्तरावरील शिक्षक आणि पत्रकारांचा प्रेरणादायी विचार इतरही तालुक्यातील विचारवंत नागरिकांनी आत्मसात केल्यास अनेक तालुकास्तरावर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा भार हलका होईल. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळEducationशिक्षणJournalistपत्रकार