शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

हाती रूमने, वाळलेले सोयाबीन; शेतकरीपुत्रांचे कोरड्या दुष्काळासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 18:04 IST

आंदोलकांनी यावेळी हातात रूमने, वाळलेल्या सोयाबीनचे काड हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली

कळंब: यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

कळंब तालुक्यातील ६८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पावसाने दडी मारल्याने बाधीत झाले आहे. पीक ऐन फुलोऱ्यात असताना पाण्याचा असह्य ताण सहन करावा लागला. यामुळे झालेले पिकाचे नुकसान शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून टाकणारे ठरले आहे.

या पार्श्‍वभूमीवर तालुकाभरातील शेतीशी निगडीत तरुणांनी 'शेतकरी पूत्र' या नावाने एकत्र येत कळंब येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी 'कोरडा दुष्काळ जाहीर करावा' यासह 'देत कसे नाहीत, घेतल्याशिवाय राहत नाहीत' अशा घोषणा देत अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात केले.

आंदोलकांनी यावेळी हातात रूमने, वाळलेल्या सोयाबीनचे काड हाती घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे, मंडळ अधिकारी तुळशीराम मटके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी पोनि सुरेश साबळे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीRainपाऊस