शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली

By गणेश कुलकर्णी | Updated: September 12, 2023 18:16 IST

तीन गावच्या शेतकऱ्यांचे आंदोलन; नगर रोडवरील वाहतूक ठप्प

धाराशिव : कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेंतर्गत होणाऱ्या भूम तालुक्यातील हिवर्डा ते सोनगिरी कालव्यातून गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरदूत करावी, अशी मागणी करीत गोरमाळा, वरुड व बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रस्ता रोखून आंदोलन केले. गोरमाळा फाटा ते नगर रोडवर केलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे व प्रभारी नायब तहसीलदार अनिल महामुनी यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात गेल्या काही वर्षांत सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावानजीकचे अनेक शेतकरी शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे स्थलांतरण रोखण्यासाठी गोरमाळा तलावात दरवर्षी पाणी सोडणे आवश्यक आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळाअंतर्गत येणारा गोरमाळा लघू तलाव गेल्या अनेक वर्षांपासून कोरडा राहत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यातून या तलावासाठी पाण्याची तरदूत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात गोरमाळा सरपंच अमोल औताडे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, अमृत भोरे, प्रवीण खटाळ, दत्तात्रय चव्हाण, अतुल शेळके, चुंबळी सरपंच कानिफनाथ गिराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, भरत नलवडे, बाळू नलवडे, संभाजी नलवडे, सतीश वारे, भरत नलवडे, आबासाहेब पिंगळे, निशिकांत शेळके, दत्तात्रय औताडे, सूर्यकांत औताडे, शिवाजी औताडे, आश्रुबा चोरमले, विलास क्षीरसागर, अण्णासाहेब तांबे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

...तर अनेक गावांचा पाणीप्रश्न लागेल मार्गीया तलावात हिवर्डा ते सोनगिरी कालव्यातून पाणी सोडल्यास परिसरातील १२ ते १५ गावांचा पिण्याच्या पिण्याचा प्रश्न तर कायमस्वरूपी मार्गी लागेलच, शिवाय तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचीही सोय होईल, असे आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादRainपाऊस