शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:50 IST

 'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही

- संतोष वीर

भूम (धाराशिव ) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवारात पिके वाहून गेली, शेतात मातीऐवजी गोटे दिसू लागले, तर अनेक घरांत पाणी शिरून कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजी महाराजांनी तालुक्यातील मात्रेवाडी, माणकेश्वर, जावळा, शिरसाव आणि सावरगाव परिसराचा दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी प्रथम मात्रेवाडी येथे भेट दिली. येथे लक्ष्मण पवार या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झाल्याने कर्ज व ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली होती.यामुळे संभाजी महाराजांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत १ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या न ठेवता त्वरित मदत मिळाली पाहिजे,  यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे. यानंतर सावरगाव शिवाराची पाहणी करताना त्यांनी पाहिले की पावसाच्या पाण्याने सुपीक माती वाहून गेली असून शेतात मोठ्या प्रमाणात गोटे साचले आहेत. शेतकऱ्यांची शेती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असा कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, माणकेश्वर येथील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने तब्बल ५५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यात घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहेत. संभाजी महाराजांनी या कुटुंबांना धीर देत ग्रामसेवक व तलाठ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. गावोगाव झालेल्या नुकसानीला न्याय मदत मिळवून देईपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी स्वराज्य संघटनेचे नीलेश वीर,विठ्ठल बाराते, भाऊसाहेब कराळे, गणेश अंधारे,सागर गायकवाड, अभीशेख कराळे,तेजस अवताडे ,वैभव बागल,अरविंद हिवरे,ऋतिक वीर,अनिकेत आकरे यांच्या सह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Maharaj directs administration: Farmers' problems need immediate relief, not just surveys.

Web Summary : Following heavy rains and farmer suicide, Chhatrapati Sambhaji Maharaj toured affected areas, urging immediate relief beyond mere assessments. He provided financial aid and instructed officials to restore farmlands and help displaced families, promising continued support until justice is served.
टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरRainपाऊसMarathwadaमराठवाडाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती