शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:50 IST

 'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही

- संतोष वीर

भूम (धाराशिव ) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवारात पिके वाहून गेली, शेतात मातीऐवजी गोटे दिसू लागले, तर अनेक घरांत पाणी शिरून कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजी महाराजांनी तालुक्यातील मात्रेवाडी, माणकेश्वर, जावळा, शिरसाव आणि सावरगाव परिसराचा दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी प्रथम मात्रेवाडी येथे भेट दिली. येथे लक्ष्मण पवार या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झाल्याने कर्ज व ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली होती.यामुळे संभाजी महाराजांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत १ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या न ठेवता त्वरित मदत मिळाली पाहिजे,  यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे. यानंतर सावरगाव शिवाराची पाहणी करताना त्यांनी पाहिले की पावसाच्या पाण्याने सुपीक माती वाहून गेली असून शेतात मोठ्या प्रमाणात गोटे साचले आहेत. शेतकऱ्यांची शेती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असा कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, माणकेश्वर येथील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने तब्बल ५५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यात घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहेत. संभाजी महाराजांनी या कुटुंबांना धीर देत ग्रामसेवक व तलाठ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. गावोगाव झालेल्या नुकसानीला न्याय मदत मिळवून देईपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी स्वराज्य संघटनेचे नीलेश वीर,विठ्ठल बाराते, भाऊसाहेब कराळे, गणेश अंधारे,सागर गायकवाड, अभीशेख कराळे,तेजस अवताडे ,वैभव बागल,अरविंद हिवरे,ऋतिक वीर,अनिकेत आकरे यांच्या सह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Maharaj directs administration: Farmers' problems need immediate relief, not just surveys.

Web Summary : Following heavy rains and farmer suicide, Chhatrapati Sambhaji Maharaj toured affected areas, urging immediate relief beyond mere assessments. He provided financial aid and instructed officials to restore farmlands and help displaced families, promising continued support until justice is served.
टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरRainपाऊसMarathwadaमराठवाडाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती