- संतोष वीर
भूम (धाराशिव ) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवारात पिके वाहून गेली, शेतात मातीऐवजी गोटे दिसू लागले, तर अनेक घरांत पाणी शिरून कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजी महाराजांनी तालुक्यातील मात्रेवाडी, माणकेश्वर, जावळा, शिरसाव आणि सावरगाव परिसराचा दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी प्रथम मात्रेवाडी येथे भेट दिली. येथे लक्ष्मण पवार या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झाल्याने कर्ज व ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली होती.यामुळे संभाजी महाराजांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत १ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या न ठेवता त्वरित मदत मिळाली पाहिजे, यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे. यानंतर सावरगाव शिवाराची पाहणी करताना त्यांनी पाहिले की पावसाच्या पाण्याने सुपीक माती वाहून गेली असून शेतात मोठ्या प्रमाणात गोटे साचले आहेत. शेतकऱ्यांची शेती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असा कडक निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, माणकेश्वर येथील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने तब्बल ५५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यात घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिक हतबल झाले आहेत. संभाजी महाराजांनी या कुटुंबांना धीर देत ग्रामसेवक व तलाठ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. गावोगाव झालेल्या नुकसानीला न्याय मदत मिळवून देईपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी स्वराज्य संघटनेचे नीलेश वीर,विठ्ठल बाराते, भाऊसाहेब कराळे, गणेश अंधारे,सागर गायकवाड, अभीशेख कराळे,तेजस अवताडे ,वैभव बागल,अरविंद हिवरे,ऋतिक वीर,अनिकेत आकरे यांच्या सह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Summary : Following heavy rains and farmer suicide, Chhatrapati Sambhaji Maharaj toured affected areas, urging immediate relief beyond mere assessments. He provided financial aid and instructed officials to restore farmlands and help displaced families, promising continued support until justice is served.
Web Summary : भारी बारिश और किसान आत्महत्या के बाद, छत्रपति संभाजी महाराज ने प्रभावित क्षेत्रों का दौरा किया, केवल आकलन से परे तत्काल राहत का आग्रह किया। उन्होंने वित्तीय सहायता प्रदान की और अधिकारियों को कृषि भूमि बहाल करने और विस्थापित परिवारों की मदद करने का निर्देश दिया, न्याय मिलने तक निरंतर समर्थन का वादा किया।