शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

उस्मानाबादेत जिल्हा बँकेने पिक विम्याचे पैसे परत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 7:00 PM

पीक विम्याच्या रकमेतून कपात केलेले पैसे परत करावेत, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कळंब तालुक्यातील नायगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

उस्मानाबाद : पीक विम्याच्या रकमेतून कपात केलेले पैसे परत करावेत, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कळंब तालुक्यातील नायगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आंदोलनातशेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

जिल्हा बँकेच्या नायगाव येथील शाखेत शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. विमा रकमेचे वाटप सुरू झाल्यानंतर २७ आॅगस्ट, १ आणि ९ आॅक्टोबर २०१८ रोजी बँकेने बहुतांश खातेदारांच्या रकमेतून १ हजार ते ३ हजार रूपयांपर्यंत पैसे कपात केले. ही रक्कम परत मिळावी, यासाठी मागील काही महिन्यांपासून संबंधित शेतकऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु, बँकेकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. कपात केलेले पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ आॅक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी कळंब तहसीलदारांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली होती.

तसेच कपात कलेले पैसे न मिळाल्यास २१ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. यानंतरही संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलनास पाठींबा दिला. यावेळी दिलीप मधुकर नाडे, व्यंकट दत्तू धाराशंकर, राजाभाऊ शितोळे, रामहरी गायकवाड, बालाजी कोकाटे, उत्तम गायकवाड, नानासाहेब शितोळे आदी शेतकरी उपस्थित होते. 

तर तीव्र आंदोलन करूजिल्हा बँकेच्या नायगाव शाखेतून निराधारांच्या पगारातून शंभर रूपये कपात केले जातात. पासबूकही प्रिंट करून दिले जात नाही. पीक विमा रकमेतून कपात केलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. उपरोक्त प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैभव पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद