शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी; मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 5:02 PM

दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये सर्वाधिक १५० मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धास्तावलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप पिके जोमात असतानाच वरूणराजाने दडी मारली. जवळपास महिनाभरापासून पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनसारखी नगदी पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. असे असतानाच बुधवारी चार वाजल्यानंतर रिमझीम पावसाला सुरूवात झाली. रात्री आठ वाजेनंतर पावसाने जोर धरला. पावसाची ही रिपरिप आज दुपारी बाजरा वाजेपर्यंतही सुरूच होती. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत  ४७.५८ मिलीमीरट पाऊस पडला आहे. सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव मंडळात ९७ मिमी, नळदुर्ग ८०, मंगरूळ १५०, इटकळ १२५, तुळजापूर ६७, उमरगा तालुक्यातील ८१ आणि भूम तालुक्यातील भूम मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस कोसळला. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबाद