शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

भूकंप अन् दुष्काळामुळे झाला होता प्राचीन तगर शहराचा नाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 19:12 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव  प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे.

ठळक मुद्दे तेर हे गाव  प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने ओळखले जायचे. भूकंप आणि दुष्काळामुळे या शहराचा नाश झाल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे़

- सुमेध वाघमारे 

तेर ( उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव  प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे. भूकंप आणि दुष्काळामुळे या शहराचा नाश झाल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे़ त्यामुळे तेरच्या समृद्ध इतिहासाला उजाळा मिळाला आहे. 

साधारणत: १९७६ मध्ये पहिल्यांदा तेरचा इतिहास अभ्यासला गेला़ त्यातून ही नगरी सातवाहन काळातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर २०१५ मध्ये पुरातत्व विभागाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली तेर येथील सर्वात उंच कोट टेकडी, बैरागी टेकडी व कैकाडी टेकडी येथे जवळपास दोन महिने उत्खनन केले. या उत्खननादरम्यान सातवाहन काळातील घराचे अवशेष, तांब्याची नाणी, शंखापासून तयार केलेले वेगवेगळे दागिने, अलंकार मणी, हस्ती दंताची फणी, तांदूळ, गहू, मूग दाळ, तूर दाळ, खापरी भांडे अशा अनेक वस्तू आढळून आल्या होत्या. पुरातत्व विभागाचे १२ अधिकारी दोन महिने येथे तळ ठोकून होते. उत्खननानंतर सदरील वस्तू अभ्यासासाठी मुंबई येथे नेण्यात आल्या. या वस्तूंवर जवळपास तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर काही निष्कर्षापर्यंत अभ्यासक पोहोचले आहेत़ हे निष्कर्ष नागरिकांचे कुतुहल वाढविणारे ठरत आहेत़

चांगल्या पाऊसपाण्याचा परिसर बनला दुष्काळी दोन हजार वर्षांपूर्वी तेरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायचा. त्यामुळे येथील घरे कौलारू स्वरूपाची होती. सुरूवातीला दगड मातीचा पाया व नंतर ३६ बाय १७ बाय ५ लांबीच्या भाजलेल्या विटा बांधकामासाठी वापरल्या जात असत.  गाय, बैल, शेळ्या यासारखे पाळीव प्राणीही अस्तित्वात होते. पाऊस चांगला होत असल्याने येथे भाताची लागवड केली जायची़ गव्हाचे पीकही घेतले जायचे.  कालांतराने पाऊसमान कमी झाले़ भूकंपाप्रमाणेच तेरच्या लुप्ततेमागे दुष्काळाचेही कारण होते.

सुती काप व्हायचे निर्यातसातवाहन काळात तेरमध्ये (तत्कालीन तगर) हस्ती दंतावर कलाकुसर करून वेगवेगळ्या वस्तू तयार करणारे कामगार होते. येथे वस्तू तयार करून ते परदेशात व्यापार करीत असत. हे काम करणाऱ्यांची या ठिकाणी मोठी वसाहतच होती. या ठिकाणी सुती कपडा तयार करणारी वसाहत होती. हा कपडा विदेशात निर्यात केला जात होता. 

खीर, भात, खिचडीचा आहार सातवाहन काळात तांदूळ, गहू, मूगदाळ, तूरदाळ, बाजरी आदी धान्य उपलब्ध होत. परंतु, त्या काळात धान्य दळण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे तांदळापासून भात, खिचडी तयार केले जात असे. गहू रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खीर तयार करण्यात येत असे.  

सांचीच्या स्तुपासाठी तेरमधून मदत या काळात बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. बौद्ध धर्माच्या त्रिरत्नासारखी धार्मिक चिन्हे असलेले मणी या उत्खननात सापडले होते. सातवाहन राजा हा बौद्ध धर्माचा उपासक होता. त्यामुळे अनेक प्रकारच्या बौद्ध स्तुपांची निर्मिती या ठिकाणी केली गेली. याच काळात सांची येथील स्तूपाच्या बांधकामासाठी तेर येथून सातवाहन राजांनी मदत केली होती. 

अनेक गोष्टी पुढे आल्या आहेततेर येथे सन २०१५ मध्ये केलेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तुंचा अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. हा अहवाल राज्यशासनाच्या पुरातत्व विभागाकडे सादर केला आहे.-  डॉ. माया पाटील,  माजी  उपसंचालिका, पुरातत्व विभाग व सोलापूर विद्यापीठाच्या प्रमुख 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणOsmanabadउस्मानाबादEarthquakeभूकंपdroughtदुष्काळ