शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: २५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची; सरकारने आमची थट्टा केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:44 IST

'तुटपुंजी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे'; भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी

- संतोष वीरभूम (धाराशिव): तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असताना, प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत अपुरी आणि 'जखमेवर मीठ चोळल्यासारखी' असल्याची तीव्र नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दौरा करूनही मदतीच्या निकषांमुळे अनेक कुटुंबांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यात नदीकाठी असलेल्या ७१२ घरांमध्ये पुराचे पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. या सर्व कुटुंबांसाठी प्रशासनाने एकत्रितपणे केवळ ५ लाख ८० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही तुटपुंजी मदत पाहता, 'ही काय चेष्टा आहे?' असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. यासह तालुक्यातील इतर १५ शेतकऱ्यांच्या २६ जनावरांच्या मृत्यूसाठी ९ लाख ५७ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

२५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांचीमदतीच्या निकषांमुळे झालेल्या अन्यायाचे एक गंभीर उदाहरण म्हणजे पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांचे कुटुंब. दातखिळे कुटुंबाच्या गोठ्यातील १७ गाई जागीच मयत झाल्या होत्या, तर १० गाई पुरात वाहून गेल्या होत्या. ट्रॅक्टर आणि शेतीचे अवजारे धरून त्यांचे एकूण २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासनाच्या निकषांनुसार, केवळ ६ गाई वाहून गेल्याची आणि मयत झाल्याची मदत म्हणून त्यांना जास्तीत जास्त २ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. शेतकरी आत्माराम दातखिळे यांनी या मदतीवर तीव्र असंतोष व्यक्त करताना म्हटले, "आमच्या २२ जनावरांची जिओ टॅगिंग झाली असताना केवळ ६ गाईची भरपाई दिली आहे. ही मदत म्हणजे सरकारने आमची थट्टा केल्यासारखे आहे."

सरकारच्या निकषांप्रमाणे मदतया संदर्भात तहसीलदार जयवंत पाटील यांनी, "सध्या सरकारच्या निकषांप्रमाणे जेवढी शक्य आहे तेवढी मदत दिली आहे. सरकारने भविष्यात निकष बदलल्यास त्या पद्धतीने वाढीव मदत दिली जाईल," असे स्पष्ट केले आहे.

निकष बदलून मदत द्याशेतकऱ्यांनी आता राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाईचे निकष बदलून जास्तीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी वर्गात असंतोष वाढून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv Farmers Decry Insufficient Aid After Massive Losses

Web Summary : Dharashiv farmers are outraged by inadequate government aid following heavy rain damage. Despite assessed losses reaching lakhs, compensation is minimal. One farmer, losing livestock and equipment, received a fraction of the actual damage, prompting accusations of mockery. Officials cite adherence to existing aid criteria.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरdharashivधाराशिवFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र