शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

Dharashiv: २५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांची; सरकारने आमची थट्टा केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:44 IST

'तुटपुंजी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे'; भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी

- संतोष वीरभूम (धाराशिव): तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असताना, प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत अपुरी आणि 'जखमेवर मीठ चोळल्यासारखी' असल्याची तीव्र नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दौरा करूनही मदतीच्या निकषांमुळे अनेक कुटुंबांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यात नदीकाठी असलेल्या ७१२ घरांमध्ये पुराचे पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. या सर्व कुटुंबांसाठी प्रशासनाने एकत्रितपणे केवळ ५ लाख ८० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही तुटपुंजी मदत पाहता, 'ही काय चेष्टा आहे?' असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. यासह तालुक्यातील इतर १५ शेतकऱ्यांच्या २६ जनावरांच्या मृत्यूसाठी ९ लाख ५७ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

२५ लाखांचे नुकसान, मदत फक्त सव्वादोन लाखांचीमदतीच्या निकषांमुळे झालेल्या अन्यायाचे एक गंभीर उदाहरण म्हणजे पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांचे कुटुंब. दातखिळे कुटुंबाच्या गोठ्यातील १७ गाई जागीच मयत झाल्या होत्या, तर १० गाई पुरात वाहून गेल्या होत्या. ट्रॅक्टर आणि शेतीचे अवजारे धरून त्यांचे एकूण २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासनाच्या निकषांनुसार, केवळ ६ गाई वाहून गेल्याची आणि मयत झाल्याची मदत म्हणून त्यांना जास्तीत जास्त २ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. शेतकरी आत्माराम दातखिळे यांनी या मदतीवर तीव्र असंतोष व्यक्त करताना म्हटले, "आमच्या २२ जनावरांची जिओ टॅगिंग झाली असताना केवळ ६ गाईची भरपाई दिली आहे. ही मदत म्हणजे सरकारने आमची थट्टा केल्यासारखे आहे."

सरकारच्या निकषांप्रमाणे मदतया संदर्भात तहसीलदार जयवंत पाटील यांनी, "सध्या सरकारच्या निकषांप्रमाणे जेवढी शक्य आहे तेवढी मदत दिली आहे. सरकारने भविष्यात निकष बदलल्यास त्या पद्धतीने वाढीव मदत दिली जाईल," असे स्पष्ट केले आहे.

निकष बदलून मदत द्याशेतकऱ्यांनी आता राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाईचे निकष बदलून जास्तीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी वर्गात असंतोष वाढून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv Farmers Decry Insufficient Aid After Massive Losses

Web Summary : Dharashiv farmers are outraged by inadequate government aid following heavy rain damage. Despite assessed losses reaching lakhs, compensation is minimal. One farmer, losing livestock and equipment, received a fraction of the actual damage, prompting accusations of mockery. Officials cite adherence to existing aid criteria.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरdharashivधाराशिवFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र