शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उमरग्यात पोलीस कारवाईत वृद्धाचा मृत्यू; मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून ग्रामस्थांनी केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 4:48 PM

ग्रामस्थांनी भावनेच्या भरात पोलिसांवर दगडफेक केली होती

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कराळी पाटीजवळ तीन दिवसा पूर्वी झालेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेनंतर तलमोड ग्रामस्थांनी पोलिस वाहन व अग्नीशमन गाडीवर केलेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या लोकांची धरपकड करताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी  दि.25 मध्यरात्री दोन वाजता झालेल्या प्रकारानंतर संतापलेल्या तलमोड ग्रामस्थांनी वृद्धाचा मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणला. दरम्यान पोलिसांची दडपशाही व मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात ठिय्या मांडला

याबाबतची माहिती अशी की, रविवारी ( दि. 21 ) दुपारी चारच्या सुमारास कराळी पाटीजवळ झालेल्या अपघातात कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेदरम्यान पोलिस प्रशासन व अग्नीशमन गाडी वेळेत पोहचली नसल्याने भावनेच्या भरात ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, अग्नीशमन गाडीचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तलमोडच्या 20 ते 25 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी गुरुवारी मध्यरात्री तलमोड गावात पोहचले.

मूकेश मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचा आजोबा दतु गणपती मोरे वय ६५ या वृध्दाने आमच्या पोरान काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृद्धाला धक्काबुक्की करत मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वृध्दाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मध्यरात्रीपासूनच गावं जागी झाला आणि पोलिसाच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्र आला. पहाटे पाचच्या सुमारास दत्तू मोरे यांचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारातील कट्यावर ठेवला. पोलिसांच्या मारहाणीमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

या प्रकरणात खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्यासह तलमोडचे बालाजी मोरे, राहुल मोरे, दगडू पाटील, मल्लीनाथ स्वामी, अमर पाटील, राजेंद्र सुगीरे, नाना पाटील, धनराज मोरे, विलास मोरे, संतराम पाटील, राजेंद्र येवते, राजेंद्र जाधव, दतू जाधव, पवन स्वामी, विजय मोरे, यादव भोसले, अशोक मोरे, सुधाकर मोरे,विजय मोरे आदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकारी व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेआठपर्यंत ग्रामस्थ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते.

टॅग्स :PoliceपोलिसOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी