शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:49 IST

मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साध्या दैनंदिन गरजा भागतील इतकीही मदत आली नाही.

- संतोष वीरभूम (धाराशिव): अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आज, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाथरूड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर 'शेतकऱ्यांना फसवणारे चोर' असल्याची धारदार टीका केली.

ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीची भीषणता मांडली. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून वाहून गेली, तर दुभती जनावरेही डोळ्यांदेखत गेली. प्रशासनाने पंचनामे करून मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साध्या दैनंदिन गरजा भागतील इतकीही मदत आली नाही. "या पॅकेजला खेकड्याने भोके पाडले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," असा बोचरा टोला ठाकरे यांनी लगावला.

'शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा'ज्या शेतकऱ्यांमुळे अखंड महाराष्ट्राला सोने पिकवून अन्न मिळते, त्याच अन्नदात्यावर वेळ आल्यावर सरकारने किडलेले आणि सडलेले धान्य खाण्यासाठी दिले. याची सरकारला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. सर्वात जास्त संताप व्यक्त करताना ते म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांनी हेक्टरी हजारो रुपये विमा भरला, त्यांना नुकसान भरपाई म्हणून काय मिळाले? एक, दोन, तीन किंवा जास्तीत जास्त पन्नास रुपये! ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे."

विमा कंपनीवर मोर्चा काढणारठाकरे यांनी यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना निर्देश दिले की, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १, २, ३ रुपये विमा जमा झाला आहे, त्यांचे बँक स्टेटमेंट जमा करा. शिवसैनिक आणि शेतकरी एकत्र येऊन विमा कंपनीवर मोर्चा काढतील आणि जाब विचारतील.

ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोलाखासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी बोलताना, "विहीर बुजलेल्यांना ३० हजार, तर जमीन खरडून गेलेल्यांना ३.५० लाख मदत करण्याची घोषणा झाली, पण साधे तीन रुपये तरी मिळाले का?" असा सवाल उपस्थित केला. तसेच, विरोधक या दौऱ्याला 'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून' आलेला दौरा म्हणत असल्याची टीका करत त्यांनी स्पष्ट केले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतीही निवडणूक नसतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती."

यावेळी माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज, शहर प्रमुख प्रकाश आकरे, उपतालुका प्रमुख अब्दुल सय्यद, गणेश दुरंदे, प्रल्हाद अडागळे,महिला जिल्हाप्रमुख जिनत सय्यद, तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav slams government for providing farmers with rotten grain.

Web Summary : Uddhav Thackeray criticizes the government for neglecting farmers affected by heavy rains in Dharashiv, providing inadequate compensation, and distributing substandard grain. He announced a protest march against insurance companies.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdharashivधाराशिवFarmerशेतकरीRainपाऊसShiv Senaशिवसेना