शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

Amol Mitkari : अहमदाबादचं नाव बदलून दाखवा, नामांतरावरुन मिटकरीचं भाजपला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 18:37 IST

उत्तर प्रदेशातील कित्येक शहरं अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलंय. लवकरच, शासन त्यावर निर्णय घेईल

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपाने शहरांच्या नामांतरावरुन राज्य सरकारला वेठीस धरू नये. शहरांची नाव बदलल्याने विकास होत नसतो, तर तेथील लोकांचा विकास महत्त्वाचा असतो, असे मिटकरी यांनी म्हटले. मिटकरी हे उस्मानाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळी धाराशिव-उस्मानाबाद नामांतरासंदर्भात त्यांनी भाष्य केलं.

उत्तर प्रदेशातील कित्येक शहरं अशी आहेत, ज्यांची नावे इस्लामी पद्धतीच्या राजवटीची आहेत, त्या शहरांची नावे तुम्ही बदलून दाखवा, असे आव्हानच मी चंद्रकांत पाटील यांना दिले होते. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नसतो, लोकांचा विकास महत्वाचा आहे. औरंगाबादच्या नामांतराचा विषय महत्वाचा आहे, पण नाव संभाजी महाराजांचं द्यायचं आणि तेथे पुन्हा विकास नसणं, कचऱ्याचे प्रश्न उद्भवणं हे औरंगाबादकरांना भेडसावत आहेत, असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. 

महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलंय. लवकरच, शासन त्यावर निर्णय घेईल. आता, राहिला प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्याचा, धाराशिव नावाची मागणी असली तर आजही भाजपा नेत्यांच्या लेटरपॅडवर उस्मानाबाद असंच लिहिलेलं आहे. त्यामुळे, जे या नाव बदलाची मागणी करतात, राज्य सरकारला वेठीस धरतात. मग, गुजरातमधील सर्वात मोठं शहर असलेल्या अहमदाबादचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलून दाखवावं, असे आव्हानच अमोल मिटकरी यांनी दिलं आहे.     

टॅग्स :MLAआमदारOsmanabadउस्मानाबादAurangabadऔरंगाबादBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस