शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी गेला तरुण; तब्बल २०० पायऱ्या चढून पोलिसांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 7:31 PM

Suicide Attempt :मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता.

ठळक मुद्देपोलिसांना पोहोचण्यात पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता.

नालासोपारा : प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी वालीव येथील एका टेकडीवर गेलेल्या तरुणाला दोन पोलिसांनी तब्बल २०० पायऱ्या चढून वाचवले. पोलिसांनी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त ठेवून नंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून घरच्यांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले. यामुळे हा तरुण निराश झाला आणि शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर गेला. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी सव्वाअकरा वाजता वालीव पोलिसांना कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंगवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता. यावेळी त्याच्याशी बोलत राहणे, धीर देणे गरजेचे होते. आम्ही त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, अशी माहिती पोलीस नाईक सचिन बळीदने दिली. हा तरुण व्यावसायिक असून त्याची वसईत कंपनी आहे.

दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या तरुणाला बोलण्यात व्यस्त ठेवले. सुमारे दोनशे पायऱ्यावर चढून त्या तरुणाला वाचवले. - राहुल पाटील, पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट