पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:24 IST2025-06-13T14:23:53+5:302025-06-13T14:24:55+5:30
एका पतीने स्वतःच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय गावातील पंचायतीने पतीच्या उपस्थितीत दिला गेला आहे.

पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील आरआयटी पोलीस स्टेशन परिसरातील सीतारामपूरच्या पलासडीह गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पतीने स्वतःच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला, आणि गंमत म्हणजे, हा निर्णय गावातील पंचायतीने पतीच्या उपस्थितीत दिला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही गावकऱ्यांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागली.
चांडिलच्या चिलगु पंचायतीतील एक तरुण आपल्या मित्रासोबत सोमवारी रात्री पलासडीह येथे आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला कारने आला होता. तो मुलीला गाडीत घेऊन जात असताना गावकऱ्यांनी त्यांना घेरले. त्यांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला गाडीतून बाहेर काढले आणि त्यांना मारहाण केली. यानंतर महिलेसह तिघांनाही रात्रभर ओलीस ठेवण्यात आले होते.
पोलिसांनाही माघार घ्यावी लागली!
या घटनेची माहिती मिळताच, एसडीपीओ समीर कुमार सवैया आणि आरआयटी पोलीस स्टेशनचे प्रभारी विनय कुमार सिंह आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी हा 'सामाजिक मुद्दा' असल्याचे सांगत पोलिसांना हस्तक्षेप करू दिला नाही. गावकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली, पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.
तीन पंचायतींनी दिला 'अजब' निकाल
मंगळवारी सकाळी पलासडीह गावात सामाजिक परंपरेनुसार ग्रामसभा भरली. यामध्ये महिलेचे सासरचे, तिचे आई-वडील आणि तिच्या प्रियकराच्या गावातील पंचायतीचे सदस्य असे तिन्ही गट एकत्र बसले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या पंचायतीत जो निर्णय झाला, तो ऐकून महिलेचा पतीही अवाक् झाला.
एक अटही घातली!
पंचायतीने निर्णय दिला की, महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात येईल. त्या बदल्यात, प्रियकराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड भरल्यानंतर महिलेला तिथेच घटस्फोट देऊन तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात आले. हा अनोखा निर्णय आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. प्रेमसंबंधांमुळे कुटुंबात निर्माण झालेल्या समस्येवर पंचायतीने अशा प्रकारे तोडगा काढल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे, तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.