शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

औरंगाबादेतील बेपत्ता १०० महिला आता आहेत कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 2:20 PM

वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून शोध सुरू नातेवाईकांची उडालीय झोप

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : १७ जुलैपासून दहा महिन्यांच्या बाळासह बेपत्ता झालेल्या पत्नीचा तपास न लागल्याने सुरक्षारक्षक पती रामराव घुले यांनी  औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच शहराच्या वेगवेगळ्या भागांतून चार वर्षांत बेपत्ता १०० महिलांचा शोध लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. या महिला, तरुणी कोठे असतील आणि त्यांची काय अवस्था असेल, या चिंतेने नातेवाईकांची झोप उडाली आहे.

शहराची लोकसंख्या पंधरा लाखांहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, गुन्हे कमी होत नसल्याचे दिसून येते. विशेषत: महिला, तरुणी घरातून निघून जाण्याचे अथवा त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढतच असल्याचे दिसून येते. चार वर्षांच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या ४८९ महिला वेगवेगळ्या कारणाने बेपत्ता झाल्या होत्या.

यातील सर्वाधिक महिला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहेत. याविषयी तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तपास करून महिलांची शोध प्रक्रिया सुरू होते. बऱ्याचदा तपास करूनही बेपत्ता महिलांचा पोलिसांना शोध लागत नाही. २०१६ साली शहरातील ९६ महिला बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ६९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. २०१७ साली बेपत्ता १३७ महिलांपैकी २० महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. २०१८ साली शहरातून गायब झालेल्या १३० महिलांपैकी १७ महिलांचा थांगपत्ता नाही, तर चालू वर्षी नोव्हेंबरपर्यंत १२६ महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यातील ९३ महिलांचा शोध लागला, तर उर्वरित ३३ महिला मिळाल्या नाहीत. बेपत्ता झालेल्या १०० महिला कोठे असतील, काय करीत असतील, त्यांना कोणी डांबून ठेवले तर नसेल ना, यासह अनेक प्रश्नांमुळे त्यांच्या नातेवाईकांना झोप येत नाही.

पोलिसांचे उत्तर : तपास सुरू आहेउस्मानपुरा परिसरातील सुरक्षारक्षक रामराव घुले यांची पत्नी १७ जुलै रोजी दहा महिन्यांच्या चिमुकल्यासह बेपत्ता झाली. यानंतर त्यांनी लगेच उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार दाखल केल्यापासून ते आजपर्यंत आपल्या पत्नीसह बाळाचा तपास लागला काय, हे विचारण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवीत आहेत. तपास सुरू आहे, एवढेच उत्तर त्यांना मिळते. यामुळे शेवटी त्यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणावर आता २ जानेवारी रोजी सुनावणी आहे. या घटनेमुळे शहरातील बेपत्ता झालेल्या महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

२०१६ ९६ महिला बेपत्ता६९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश२०१७१३७ महिला बेपत्ता२0 महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही२०१८१३0 महिला बेपत्ता१७ महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही२०१९१२६ महिला बेपत्ता९३ महिलांचा शोध लागला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंWomenमहिलाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस