शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Video : निव्वळ योगायोग! कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा

By पूनम अपराज | Updated: November 20, 2018 18:36 IST

मुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल. 

ठळक मुद्देकसाबला रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर जिगरबाज पोलिसांनी पकडले१० वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयावह आठवणी आणि जखमा अजून ताज्या आहेत. या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमीर कसाब. चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल. 

मुंबई - बघता बघता २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी १० दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले आणि त्यापैकी कसाब आणि अबू इस्माईल या दोघांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षागृहात अंधाधुंद गोळीबार करून अनेक निष्पापांचे जीव घेतले. यानंतर कसाबला रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर जिगरबाज पोलिसांनी पकडले. या जिगरबाज पोलीस अधिकऱ्यांपैकी एक हेमंत बावधनकर. मुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि चक्क १० वर्षांनी ज्यांचा कसाबला पकडून देण्यात महत्वाचा सहभाग आहे त्या बावधनकर यांच्या खांद्यावर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल. 

२६ नोव्हेंबर २००८ ला १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसून अंदाधुंद गोळीबार केला आणि निष्पापांची कत्तल केली.१६६ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा रक्षकांची हत्या या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली. १० वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयावह आठवणी आणि जखमा अजून ताज्या आहेत. या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमीर कसाब. या देशद्रोही कसाबला जिवंत पकडून देताना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे शाहिद झाले. मात्र, गिरगाव चौपाटीवर शाहिद ओंबळे यांच्यासह संजय गोविलकर, भास्कर कदम आणि हेमंत बावधनकर मिळून १६ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचे कसाबला जिवंत पकडून देण्यात महत्वाचे योगदान असल्याचं म्हणता येईल.   

कसाबने बेछूट गोळीबार करत आणि हॅण्ड ग्रेनेड फेकून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सुरुवात सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून झाली आणि या स्थानकात जवळपास ५८ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच सीएसएमटी रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी शशांक शिंदे यांना देखील या हल्ल्यात शाहिद व्हावं लागलं. आता त्याच मुंबईतील महत्वाच्या आणि संवेदनशील अशा रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी हेमंत बावधनकर मोठ्या जिकरीने सांभाळत आहेत. २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत असली तरी त्या थरकाप उठवून देणाऱ्या कटू आठवणी मात्र कायम आहेत. दहशतवाद्यांनी सर्वप्रथम टार्गेट केलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी पेलताना बावधनकर अतिशय दक्ष असतात. २६/११ हल्ल्यानंतर महत्वाची रेल्वे स्थानक म्हणजेच मुंबई सेंट्रल, सीएसएमटी सारखी रेल्वे स्थानकं उडवून देणाऱ्या कॉल्सने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची  झोप उडवली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPoliceपोलिसCSMTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस