शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वैभव राऊतसह अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 21:15 IST

आज पुणे, नालासोपारा आणि सोलापूर येथे एटीएसने पुन्हा मारले छापे

मुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवडय़ात शुक्रवारी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) अटक केली होती. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब, स्फोटके, रिव्हॉल्व्हर, स्फोटके बनविण्याचे साहित्य आणि अन्य शस्त्रसठय़ासह सिमकार्ड, मोबाईल, बॉम्ब  तयार करण्याची माहिती, हार्डडिस्क, डायरी, इंनोवा गाडी आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या. आज न्यायालयात एटीएसने तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करत तिन्ही आरोपींच्या चौकशीतून उजेडात आलेली माहिती आणि तपासातील प्रगतीची माहिती आज न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने या तिघांचीही पोलीस कोठडी २८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  बॉम्ब, स्फोटके बनविण्याचे साहित्य, शस्त्रसाठय़ाचा संभाव्य वापर, कट, आरोपींचे कनेक्शन, साथीदार ज्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. याबाबत एटीएसने गेल्या आठ दिवसांत तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली. नालासोपारा, औरंगाबाद, सोलापूर पुण्यात छापे घातले. तसेच आरोपींशी संबंधित अनेकांची चौकशी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही आरोपींची चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तसेच आज दुपारी नालासोपारा येथे वैभव, पुण्यातील सुधान्वाच्या घरी आणि सोलापूर येथे एटीएसने छापेमारी केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकPoliceपोलिसMumbaiमुंबईPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र