शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रतीकची हत्या करणारे तिघे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 06:30 IST

शेलारनाका परिसरात प्रतीक, बाली जैसवार, निलेश धुणे यांना बोलावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली होती.

कल्याण : रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून प्रतीक गावडे (३०) याची हत्या, तसेच त्याच्या दोन मित्रांवर हल्ला करून पसार झालेले रवी लगाडे (२०, रा. शेलारनाका) व चंद्रकांत ऊर्फ चंदू जमादार (२१, रा. आजदेगाव) या दोघा सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेने २४ तासांत पकडले. तर, रमेश ऊर्फ झांगऱ्या घोरनाळला रामनगर पोलिसांनी अटक केली. तिघांना कल्याण न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.शेलारनाका परिसरात प्रतीक, बाली जैसवार, निलेश धुणे यांना बोलावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली होती. यात प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या गुन्ह्याचा समांतर तपास करणाºया कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दत्ताराम भोसले आणि राजेंद्र खिलारे यांना हल्लेखोर कचोरेगाव येथील गावदेवी मंदिराच्या मागील बाजूस लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र्र घोलप आदींच्या पथकाने सापळा रचला. यावेळी संशय आल्याने ९० फुटी रोडने कल्याण पत्रीपुलाच्या दिशेने पळणाºया रवी लगाडे आणि चंद्रकांत यांना पथकाने पाठलाग करून पकडले. दरम्यान, या दोघांनीही गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी