शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडे तीन हजार जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 1:34 AM

ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देभार्इंदरमध्ये सर्वाधिक दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे४२ दिवसांमध्ये ७४५ गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७४५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात संचारबंदीचे उल्लंघन करणे, विनाकारण वाहने रस्त्यांवर आणणे, कोरोनाची लक्षणे असतांना तसेच विलगीकरणात ठेवलेले असतांनाही बाहेर फिरणे अशा अनेक कारणांमुळे साथ प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८ तसेच कलम २६९ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. २२ मार्च ते ५ मे २०२० या ४२ दिवसांच्या कालावधीमध्ये मीरा रोडमध्ये ९८१ आरोपींविरुद्ध ३०२ गुन्हे दाखल झाले. तर भार्इंदरमध्ये दोन हजार १३५ जणांविरुद्ध २७१ गुन्हे नोंदविले गेले. शहापूरात २०८ जणांविरुद्ध ८५ गुन्हे, मुरबाडमध्ये १२४ जणांविरुद्ध ४३ तर गणेशपूरी विभागात ९१ जणांविरुद्ध ४४ गुन्हयांची नोंद झाली. याशिवाय, मनाई आदेशाचा भंग करणा-या तिघांविरुद्ध तर औषध द्रव्य कलमाखाली मुरबाडमधील दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस