शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

“कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याची आमची औकात नाही; न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:15 IST

तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं बिहारचे डीजीपी म्हणाले.

ठळक मुद्देआमच्या एसपींना कैदी बनवून त्याठिकाणी ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर जनतेचा विश्वास आहे. आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं बिहार पोलीस आपल्या अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी कोर्टात जाईल 

पटना – सुशांत प्रकरणात सत्य जनतेसमोर यावं ही सगळ्यांची इच्छा आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले जात नाही. सुप्रीम कोर्ट देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे. तरीही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचंही मुंबई पोलीस उल्लंघन करत आहे. मुंबई पोलीस सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन करत आहे, आमची औकात नाही, आम्ही छोट्या न्यायालयाचा आदेशही मानतो, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, न्यायालयाची प्रतिमा आहे ती जपली पाहिजे असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले.

याबाबत गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर लोकशाही संकटात येईल, न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. आमच्या एसपींना कैदी बनवून त्याठिकाणी ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर जनतेचा विश्वास आहे. आता तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं ते म्हणाले.

तसेच आजच्या दिवस आम्ही वाट पाहणार आहोत, जर विनय तिवारी यांना सोडण्यात आलं नाही तर महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊ, त्यानंतर बिहार पोलीस आपल्या अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी कोर्टात जाईल असं डीजीपी यांनी सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी बिहार पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे. उच्च न्यायालय म्हटलं की, मुंबई पोलिसांनी बिहार पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही विनय तिवारी यांना सोडण्यात आलं नाही. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातील संघर्ष वाढला आहे.

 

काय आहे प्रकरण?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद रंगला आहे. बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी सुशांतच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले असता येथील पोलिसांना त्यांना सहकार्य केले नाही. त्यानंतर आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना जबरदस्तीनं क्वारंटाईन करण्यात आले. मुंबई महापालिकेने अद्याप विनय तिवारी यांचे क्वारंटाईन संपवले नाही. त्यानंतर बिहार पोलिसांनी यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय