शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

“कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याची आमची औकात नाही; न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर…”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 6:12 PM

तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं बिहारचे डीजीपी म्हणाले.

ठळक मुद्देआमच्या एसपींना कैदी बनवून त्याठिकाणी ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर जनतेचा विश्वास आहे. आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं बिहार पोलीस आपल्या अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी कोर्टात जाईल 

पटना – सुशांत प्रकरणात सत्य जनतेसमोर यावं ही सगळ्यांची इच्छा आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले जात नाही. सुप्रीम कोर्ट देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे. तरीही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचंही मुंबई पोलीस उल्लंघन करत आहे. मुंबई पोलीस सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन करत आहे, आमची औकात नाही, आम्ही छोट्या न्यायालयाचा आदेशही मानतो, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, न्यायालयाची प्रतिमा आहे ती जपली पाहिजे असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले.

याबाबत गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर लोकशाही संकटात येईल, न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. आमच्या एसपींना कैदी बनवून त्याठिकाणी ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर जनतेचा विश्वास आहे. आता तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं ते म्हणाले.

तसेच आजच्या दिवस आम्ही वाट पाहणार आहोत, जर विनय तिवारी यांना सोडण्यात आलं नाही तर महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊ, त्यानंतर बिहार पोलीस आपल्या अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी कोर्टात जाईल असं डीजीपी यांनी सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी बिहार पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे. उच्च न्यायालय म्हटलं की, मुंबई पोलिसांनी बिहार पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही विनय तिवारी यांना सोडण्यात आलं नाही. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातील संघर्ष वाढला आहे.

 

काय आहे प्रकरण?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद रंगला आहे. बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी सुशांतच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले असता येथील पोलिसांना त्यांना सहकार्य केले नाही. त्यानंतर आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना जबरदस्तीनं क्वारंटाईन करण्यात आले. मुंबई महापालिकेने अद्याप विनय तिवारी यांचे क्वारंटाईन संपवले नाही. त्यानंतर बिहार पोलिसांनी यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय