शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 22:38 IST

राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली.

ठळक मुद्देराजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातल्या चिकसानाची ही घटना आहे.गावातल्या संदीप नावाच्या तरुणाने गावकऱ्यांकडून त्यांचे एटीएम कार्ड्स घेतल्याचं सांगितले.

नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य गोष्टी उपलब्ध नाहीत. सर्व यंत्रणा ठप्प आहे. बँका सुरु असल्या तरी व्यवहारच नसल्याने पैशांची देवाणघेवाण देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पैशांची खूप अडचण भासत आहे. त्यातच राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली. राजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातल्या चिकसानाची ही घटना आहे.

सुरूवातीला याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. मात्र, ३ गावांमध्ये खात्यात आलेल्या पैश्यांबाबत कुजबूज सुरू झाल्याने सगळ्या लोकांनी अखेर पोलीस ठाणं गाठलं आणि हा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितले.  चिकसाना आणि नजीकच्या अन्य दोन गावांमध्ये नागरिकांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने पहिल्यांदा ते आनंदित झाले आणि नंतर ते घाबरून गेले. अचानक सगळ्यांना मोबाईलवर मेसेज येऊ लागल्याने लोकांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं कळालं. त्यानंतर संबंधित नागरिकांनी पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा

 

धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

 

धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

त्यांच्या गावातल्या संदीप नावाच्या तरुणाने गावकऱ्यांकडून त्यांचे एटीएम कार्ड्स घेतल्याचं सांगितले. त्याने त्याच्या मित्राने नौदलात नोकरी लागण्यासाठी १० लाख रुपये एका व्यक्तीला दिले होते. तरीदेखील नोकरी लागली नाही. त्यातच त्याच्या बहिणीचं लग्न असल्याने त्याला ते पैसे परत घ्यायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रोख रक्कम घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्याने शक्कल लढवून गावातल्या अनेकांकडून एटीएम कार्ड्स घेतली. तरुणाने तीन गावांमधील तब्बल ५४ लोकांकड़ून कार्ड घेत कुणालातरी गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. संदीप फरार असून पोलीस तपास करत आहेत. आपल्या बँकेचे डिटेल्स देताना सावध राहा असं आवाहन पोलिसांनी सगळ्यांना केलं आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमRajasthanराजस्थानPoliceपोलिसbankबँक