शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

...म्हणून 'या' आयपीएस अधिकाऱ्याने दिला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 7:22 PM

नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ अब्दुल रेहमान यांनी दिला राजीनामा

ठळक मुद्देविधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातही आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली आहे. धर्माच्या आधारावर कुठलाही कायदा किंवा निर्णय घेतला जाऊ शकत नाही.

मुंबई - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) अखेर मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरु झाले आहे. तसेच विधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातही आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली आहे. 

अब्दुल रेहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या संविधानाविरोधात असल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. सर्व न्यायप्रेमींनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. आयपीएस अधिकारी रहमान यांनी आपल्या ट्विटरवरून केंद्रीय गृहमंत्री यांना निशाणा साधला आहे. नागरिकत्वाच्या समर्थनासाठी गृहमंत्री देत असलेला तर्क चुकीचा असल्याचे त्यांनीम्हटले आहे. 

दरम्यान, बुधवारी राज्यसभेत विधेयकाला मंजुरी मिळाली. मतदानावेळी शिवसेनेने सभात्याग केला. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विधेयकाविरोधात १०५ मते पडली. राज्यसभेत देखील हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांत हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अब्दुल रेहमान हे सध्या राज्याच्या मानवी हक्क आयोगाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गैरवर्तणुकीबद्दल त्यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी सुरु आहे. राजीनाम्याच्या पत्रात रेहमान यांनी अनेक आरोप केले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मुस्लिम समाजासोबत भेदभाव करणारे आहे. संविधानाने कलम १४, १५ आणि २५ नुसार समानतेच्या मूकबहुत अधिकारांचे या विधेयकामुळे उल्लंघन होत आहे. 

धर्माच्या आधारावर कुठलाही कायदा किंवा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. मुस्लिम समाजाला वेगळे पडणारे असे हे विधेयक आहे, असा आरोप अब्दुल रेहमान यांनी केला आहे. अब्दुल रेहमान यांनी आपल्या ट्विटरमध्ये दोन पत्र जोडली आहेत. एका ट्विटरमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसऱ्या पत्रात कॅबला विरोध करण्याची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुसृष्टी विधेयक (कॅब) हे दोन्ही विधेयकं एकत्र राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आसाममधून १९ लाख नागरिक एनआरसीच्या बाहेर ठेवले गेले आहे. त्यात १४ ते १५ लाख हिंदूंचा समावेश आहे. एनआरसी आणि कॅब एकत्र लागू केले तर दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांच्यापैकी कुणीही जर नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपते देऊ शकली नाही तर त्यांना निर्वासित म्हणून घोषित करण्यात येईल. त्यामुळे अनुसूचित जाती - जमाती आणि मुस्लिम समुदाय या विधेयकाला विरोध करण्यासाठी आवाहन करतो असे रेहमान यांनी पत्रात मांडले आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिसTwitterट्विटरResignationराजीनामा