नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 21:46 IST2018-09-21T21:46:03+5:302018-09-21T21:46:31+5:30
पालघर पोलिसांनी जिल्ह्यात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या विरोधात अटकेची मोहीम सुरू केली आहे.

नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक
पालघर - पालघर पोलिसांनी जिल्ह्यात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या विरोधात अटकेची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वसई स्थानिक गुन्हे शाखेने नालासोपाऱ्यातून सहा बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अली मोगल मिध्धा (वय २२ ), शहाजान मुल्ला दुलाल मुल्ला (वय २७), शीमूल तबिबार शेख ( वय २५ ), जिन्नत रोफेजल शेख (वय ३३), जॉनी हाजीबा सरदार (वय ३०), आणि मुन्नी टूटूल मंडल (वय २६ ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे पाचही जण गैररित्या भारतात वास्तव्य करत होते. त्यामुळे त्यांना परदेशी नागरिक अधिनियम कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.