शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आंतरजातीय विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी तरुणीसोबत जबरदस्तीने लग्न केलं, नंतर बलात्कार करून घराबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:49 IST

Crime News: एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले.

जयपूर - आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देते. समाजिक समरसता निर्माण व्हावी, अस्पृश्यता निवारण व्हावे, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र सरकारच्या या योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी काही बदमाश मुलींच्या जीवनाशी खेल करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील चुरूजवळच्या बिसाऊ ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. (To take advantage of the inter cast marriage scheme, he forcibly married a young woman, then raped her and kicked her out of the house)

येथे एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले. या तरुणाने केलेल्या छळामुळे दु:खी झालेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले.

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडितेची निकेश जाट नावाच्या तरुणाशी ओळख होती. दरम्यान, निकेशने तिला फूस लावून दिल्लीला नेले. तिथे अनुसूचित जातीच्या मुलीशी विवाह केल्याबद्दलचे पाच लाख रुपये सरकारकडून मिळावेत म्हणून त्याने तिला धमकावून तिच्याशी लग्न केले. सदर तरुणाने पीडितेला ७ दिवस बंदी बनवून ठेवले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार पोलिसांचे भय आणि पाच लाख रुपयांच्या आमिषामुळे निकेशने सदर तरुणीला आधी घरी आणले. त्यानंतर मारहाण करून तिला घराबाहेर काढले.

नातेवाईकांनी सांगितले की, आरोपी तरुण निकेश याने तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास तिला विकून टाकण्याची धमकी दिली. तर पीडितेने सांगितले की, आता आरोपीकडचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे धक्का बसलेल्या पीडितेने सोमवारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने सुरुवातीला तणावाखाली येत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. प्रकृती बिघडल्याने पीडितेला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बिसाऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलीस आरोपींविरोधात कुठलीही कारवाई करत नसल्याचा, आरोप पीडितेने केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान