शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

धक्कादायक! आंतरजातीय विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी तरुणीसोबत जबरदस्तीने लग्न केलं, नंतर बलात्कार करून घराबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:49 IST

Crime News: एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले.

जयपूर - आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देते. समाजिक समरसता निर्माण व्हावी, अस्पृश्यता निवारण व्हावे, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र सरकारच्या या योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी काही बदमाश मुलींच्या जीवनाशी खेल करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील चुरूजवळच्या बिसाऊ ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. (To take advantage of the inter cast marriage scheme, he forcibly married a young woman, then raped her and kicked her out of the house)

येथे एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले. या तरुणाने केलेल्या छळामुळे दु:खी झालेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले.

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडितेची निकेश जाट नावाच्या तरुणाशी ओळख होती. दरम्यान, निकेशने तिला फूस लावून दिल्लीला नेले. तिथे अनुसूचित जातीच्या मुलीशी विवाह केल्याबद्दलचे पाच लाख रुपये सरकारकडून मिळावेत म्हणून त्याने तिला धमकावून तिच्याशी लग्न केले. सदर तरुणाने पीडितेला ७ दिवस बंदी बनवून ठेवले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार पोलिसांचे भय आणि पाच लाख रुपयांच्या आमिषामुळे निकेशने सदर तरुणीला आधी घरी आणले. त्यानंतर मारहाण करून तिला घराबाहेर काढले.

नातेवाईकांनी सांगितले की, आरोपी तरुण निकेश याने तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास तिला विकून टाकण्याची धमकी दिली. तर पीडितेने सांगितले की, आता आरोपीकडचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे धक्का बसलेल्या पीडितेने सोमवारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने सुरुवातीला तणावाखाली येत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. प्रकृती बिघडल्याने पीडितेला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बिसाऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलीस आरोपींविरोधात कुठलीही कारवाई करत नसल्याचा, आरोप पीडितेने केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान