शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

अर्णब गोस्वामींना तळोजाला हलविण्यामागे वेगळेच कारण; तपास अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

By हेमंत बावकर | Updated: November 8, 2020 20:20 IST

Arnab Goswami News: गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. याच्या मागे त्यांची सुरक्षा कारणीभूत नसून गोस्वामींनी अलिबागच्या शाळेत बनविलेल्या सब जेलमध्ये मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केल्याचे समोर आले आहे. 

गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तळोजा जेलमध्ये नेत असताना गोस्वामी यांनी पोलीस व्हॅनच्या खिडकीतून ओरडत शनिवारी अलिबाग जेलरनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच जबरदस्तीने तळोजा जेलमध्ये नेण्यात येत असून माझ्या जिवाला धोका असल्याची ओरड मारली. तसेच न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा, असेही गोस्वामी बोलले. 

नाईक आत्महत्या प्रकरणाच तपास करणारे पोलीस अधिकारी जमील शेख यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी अर्णब गोस्वामी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समजले. ते दुसऱ्या कोणाचातरी फोन वापरत होते. आम्ही त्यांचा फोन आधीच जप्त केला आहे. या प्रकारानंतर गोस्वामींकडे हा फोन कसा आला याचा तपासणी अहवाल लिहिण्याचे पत्र तुरुंग अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या अहवालानुसार आम्ही गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलविले. 

दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.

नारायण राणेंकडून गोस्वामींची पाठराखणनारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. 'अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.', असे ट्विट नारायण राणेंनी केलंय. 

पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणीअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता सोमवारी, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकSuicideआत्महत्याPoliceपोलिसjailतुरुंग