शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:52 IST

काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे.

बिहारच्या समस्तीपूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. कौटुंबिक तणाव आणि मानसिक दबावामुळे त्रस्त असलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाने आपल्या सुसाइड नोटमध्ये पत्नी आणि सासरच्या मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ही घटना पटोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर सुरत गावात घडली आहे. दिग्विजय कुमार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

घटनास्थळावरून पोलिसांना चार पानांची सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वेदना, मानसिक छळ आणि पोटच्या मुलीपासून दूर राहण्याचे दुःख सविस्तरपणे मांडलं आहे. दिग्विजयने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, त्याची पत्नी आणि सासरची माणसे त्याला सतत मानसिक त्रास देत होते. पत्नी राधिका त्याला बेरोजगारीवरून टोमणे मारायची, आपल्या मैत्रिणींच्या पतींशी त्याची तुलना करायची आणि सोशल मीडियावरील स्टेटस पाहून त्याच्याशी भांडण करायची, असा आरोप त्याने केला आहे.

पत्नीची मोठी बहीण नेहा या प्रकरणांत सर्वात जास्त हस्तक्षेप करायची आणि तिच्या सांगण्यावरूनच पत्नी आणि मुलीला घरातून नेण्यात आलं, असंही त्याने नमूद केलं आहे. दिग्विजयने पुढे लिहिलं की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी पत्नीचे वडील आणि भाऊ काही लोकांना घेऊन त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर ते पत्नी आणि लहान मुलीला आपल्यासोबत घेऊन गेले. तेव्हापासून तो आपल्या मुलीला भेटू शकला नव्हता.

मुलीला पाहण्यासाठी तो व्हिडीओ कॉल करायचा, पण पत्नी मुलीचा चेहराही दाखवत नव्हती, ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. सुसाइड नोटमध्ये आपले आई-वडील आणि भावंडांची माफी मागताना त्याने लिहिलं की, तो एक चांगला मुलगा आणि भाऊ बनू शकला नाही. तो यूपीएससीची (UPSC) तयारी करत होता, मात्र कौटुंबिक वादाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केलं.

आपल्या शेवटच्या इच्छेत त्याने लिहिलं की, त्याच्या मुलीचा सांभाळ त्याच्या भावाने करावा आणि तिच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी घ्यावी. तसेच, पत्नी आणि सासरच्या लोकांना शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्याने केली आहे. दुसरीकडे दिग्विजयच्या सासऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत म्हटलं की, दिग्विजयने नोकरी करावी आणि जबाबदारी पार पाडावी एवढीच त्यांची इच्छा होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस