शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:06 IST

Crime News: वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या कारची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांसह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी तक्रार देऊन एपीएमसी पोलिसांचीदेखील फसवणूक करण्यात आली आहे.वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी संगनमत करून जप्तीतल्या कारची परस्पर विक्री केल्याचा आरोप सीवूड येथील बाळासाहेब चलर यांनी केला आहे. चलर यांनी २०१३ मध्ये २६ लाखांची कार खरेदी केली होती. त्यासाठी एचडीएफसीमधून २२ लाखांचे कर्ज काढले होते. काही महिन्यांतच हे कर्ज त्यांनी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडमध्ये वर्ग केले होते. २०१६ मध्ये व्यवसायातील तोट्यामुळे त्यांचे काही हप्ते थकले होते. त्यामुळे कोटक महिंद्राच्या रिकव्हरी एजंटने कोणतीही पूर्वसूचना न देता कार जप्त केली. त्यानंतर एक महिन्याने त्यांना ७ लाख ६६ हजार भरून कार घेऊन जाण्यास सांगण्यात आले. शिवाय तडजोड करून त्यांना ४ लाख २५ हजार भरण्यास सांगण्यात आले.यानुसार पुढील काही महिन्यात चलर यांनी पूर्ण रक्कम भरूनदेखील त्यांना कारचा ताबा देण्यास टाळाटाळ सुरू होती. अखेर त्यांनी वाशी आरटीओमध्ये चौकशी केली असता त्यांच्या कारचा बाजारभाव १८ लाख असतानाही १२ लाखाला विकली असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी सदर कार ट्रान्सफर होऊ नये यासाठी आरटीओला पत्र दिले. त्यानंतरही सदर कार विजय गारोडकर याच्या नावे ट्रान्सफर करण्यात आली. त्यासाठी कोटक महिंद्रा यांच्याकडून आरटीओकडे कोरी एनओसी जमा करण्यात आली होती; परंतु गाडीची मूळ कागदपत्रे चलर यांच्याकडेच असताना गाडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कशी ट्रान्सफर झाली याबाबत आरटीओकडे चौकशी करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. 

पोलिसांचीही फसवणूक-चलर यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यातल्या नोंदी तपासल्या असता, गाडीचे आरसी बुक व इतर कागदपत्रे आरटीओमधून गहाळ झाल्याची खोटी तक्रार दिल्याचे समोर आले. -गाडीची सर्व कागदपत्रे चलर यांच्याकडे असताना ती आरटीओमध्ये जमा असून, गहाळ झाली असल्याची खोटी तक्रार देण्यात आली होती. यावरून गाडीच्या विक्रीसाठी खोटी तक्रार देऊन पोलिसांचीही फसवणूक केल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबई