शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Ranchi Voilence : माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 20:04 IST

Ranchi Violence: या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनादरम्यान गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुदस्सीर आलम आणि साहिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

त्यांनी सांगितले की, रांची हिंसाचाराच्या वेळी आंदोलकांनी गोळीबारही केला होता. यावेळी 12 पोलीस आणि 12 आंदोलक जखमी झाले. एका पोलिसाला गोळी लागली आहे. होमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल 22 जखमींपैकी दोन-तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाकीची प्रकृती ठीक आहे. रांची हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या हिंदपिरी भागातील मुदस्सीर आलमच्या डोक्यात गोळी लागली होती. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील परवेझ आलम, आई निखत यांची प्रकृती खालावली आहे.आई-वडील म्हणाले, माझा मुलगा खूप मनमिळावू होता...रांची हिंसाचारात प्राण गमावलेल्या मुदस्सीरच्या पालकांनी सांगितले की, तो माझा एकुलता एक मुलगा आहे. गरिबीमुळे आम्ही त्याला नीट शिकवू शकलो नाही पण माझा मुलगा खूप मनमिळाऊ होता. त्याला का गोळ्या घातल्या, त्याचा काय दोष होता? मृत मुदस्सीरचे काका मोहम्मद शाहिद हे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपल्या पुतण्याच्या मृत्यूला झारखंड सरकार आणि रांची जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या गोळ्या लागल्याने मुदस्सीरचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. आंदोलक अतिरेकी नव्हते. मग त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या? पोलिस एके-47 आणि पिस्तुलाने गोळीबार करत असल्याचा आरोप केला.रांची हिंसाचारात साहिलचा मृत्यू झालारांची हिंसाचारात मुदस्सीरशिवाय आणखी एक तरुण साहिलचाही मृत्यू झाला आहे. रिम्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनानुसार, त्याच्या मूत्रपिंडात गोळी लागली होती, त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. साहिलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो मेन रोडवरील एका दुकानात रोजंदारीसाठी काम करत असे. कामावरून परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. निषेध मोर्चात संतप्त लोकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या किंवा रबर गोळ्या सोडण्याऐवजी थेट गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हेमंत सोरेन सरकारवर नाराजी व्यक्त करत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडDeathमृत्यूFiringगोळीबार