शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Ranchi Voilence : माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 20:04 IST

Ranchi Violence: या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनादरम्यान गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुदस्सीर आलम आणि साहिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. 

त्यांनी सांगितले की, रांची हिंसाचाराच्या वेळी आंदोलकांनी गोळीबारही केला होता. यावेळी 12 पोलीस आणि 12 आंदोलक जखमी झाले. एका पोलिसाला गोळी लागली आहे. होमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल 22 जखमींपैकी दोन-तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाकीची प्रकृती ठीक आहे. रांची हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या हिंदपिरी भागातील मुदस्सीर आलमच्या डोक्यात गोळी लागली होती. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील परवेझ आलम, आई निखत यांची प्रकृती खालावली आहे.आई-वडील म्हणाले, माझा मुलगा खूप मनमिळावू होता...रांची हिंसाचारात प्राण गमावलेल्या मुदस्सीरच्या पालकांनी सांगितले की, तो माझा एकुलता एक मुलगा आहे. गरिबीमुळे आम्ही त्याला नीट शिकवू शकलो नाही पण माझा मुलगा खूप मनमिळाऊ होता. त्याला का गोळ्या घातल्या, त्याचा काय दोष होता? मृत मुदस्सीरचे काका मोहम्मद शाहिद हे AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपल्या पुतण्याच्या मृत्यूला झारखंड सरकार आणि रांची जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या गोळ्या लागल्याने मुदस्सीरचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. आंदोलक अतिरेकी नव्हते. मग त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या? पोलिस एके-47 आणि पिस्तुलाने गोळीबार करत असल्याचा आरोप केला.रांची हिंसाचारात साहिलचा मृत्यू झालारांची हिंसाचारात मुदस्सीरशिवाय आणखी एक तरुण साहिलचाही मृत्यू झाला आहे. रिम्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनानुसार, त्याच्या मूत्रपिंडात गोळी लागली होती, त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. साहिलच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो मेन रोडवरील एका दुकानात रोजंदारीसाठी काम करत असे. कामावरून परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. निषेध मोर्चात संतप्त लोकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या किंवा रबर गोळ्या सोडण्याऐवजी थेट गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हेमंत सोरेन सरकारवर नाराजी व्यक्त करत गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडDeathमृत्यूFiringगोळीबार