शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 5:48 PM

उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देआज  पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. आंतराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्‍यक्ष अब्‍दुल कावी अहमद युसूफ यांनी कुरेशी यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास टोकले.सुरुवातीलाच कुलभूषणच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर चढ्या आवाजात युक्तिवाद करत होते.

द हेग - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतराष्ट्रीय कोर्टात कालपासून सुनावणी सुरु झाली असून आज या सुनावणीच्या दुसरा दिवस. काल दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. तर आज  पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. त्यावेळी सुरुवातीलाच कुलभूषणच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर चढ्या आवाजात युक्तिवाद करत होते. त्यावेळी आंतराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्‍यक्ष अब्‍दुल कावी अहमद युसूफ यांनी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान  यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास टोकले. तसेच आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करावा अशी मागणी पाकिस्तानतर्फे करण्यात आली होती. ती मागणी देखील कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने उद्या तिसऱ्या दिवसापर्यंत स्थगित केली आहे. उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.    

जाधवच नव्हे तर भारतावरही पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान म्हणाले, 'मी स्वत: भारतीय क्रूरतेचा शिकार आहे. मी तरुण लष्करी अधिकारी म्हणून भारतीय तुरुंगात कैद होतो. पाकिस्तानमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० मुलांचे जीव गेले. हा भारताचा पाठिंबा असणाऱ्या अफगाणिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला होता. पाकिस्तानने आंतराष्ट्रीय कोर्टात नऊ मुद्दे ठेवले असून जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होता आणि त्याने पाकिस्तानात दहशत पसरवण्यासाठी अनेक पाकिस्तानविरोधी शक्तींना सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी तयार केले होते. पूर्ण देश याला खतपाणी घालत आहे. विचित्र वागणुकीतून कुलभूषण मुक्त, दोषमुक्त करा असा दावा भारताकडून केला जात आहे. मात्र, भारताकडे विश्वासाची कमरतात असल्याची टीका करत पाकिस्तानने युक्तिवाद केला आहे. उद्या दुपारी ३ वाजता भारत आणि पाकिस्तानला बाजू मांडण्यासाठी दुसऱ्यांदा वेळ देण्यात आली असून युक्तिवादात तेच तेच मुद्दे पुन्हा येऊ नयेत याची काळजी काळजी घेण्याचे कोर्टाने बजावले आहे. 

काल पार पडलेल्या सुनावणीवेळी दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. यावेळी यांनी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने केलेल्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. तसेच पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असून, तब्बल 13 वेळी विनंती करूनही कुलभूष जाधव यांना कौन्सिलर अॅक्सेस दिलेला नाही. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, मात्र पाकिस्तान त्यांना फसवून आपला अजेंडा पुढे रेटू पाहत आहे, असा आरोपही साळवे यांनी केला.  

कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवCourtन्यायालयPakistanपाकिस्तानIndiaभारत