शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

NCB कोणताही राजकीय पक्ष,जात, धर्म पाहून कारवाई करत नाही; समीर वानखेडे यांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 20:32 IST

Mumbai cruise drugs case : या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एनसीबीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देआम्ही पुराव्याच्या आधारावर बोलतो. आम्हाला जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार. कोर्ट सांगेल त्याप्रमाणे आम्ही करू असे वानखेडे यांनी पत्रकारांना सांगितले. 

क्रूज ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना आज अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) उत्तर दिले. नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. क्रूजवर २ ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही कायदेशीर नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान १४ जणांना कलम ६७ च्या नोटिशीनुसार ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील आठ जणांना अटक केली होती, तर इतरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे, असा खुलासा एनसीबीचे एडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा बेछूट आरोप केला. मात्र, या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एनसीबीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.

 

तसेच ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत आहे. मुंबई NCB टीमने मोठी कारवाई केली.  क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यात ८ जणांना अटक केली तर ९ साक्षीदार होते. यांना NCB कधीच ओळखत नव्हती. मनिष भानुशाली यांना आरोपींना घेवून जाण्यास कोणीही आदेश दिले नव्हते. कॅमे-याची गर्दी होती म्हणुन त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितले. सगळ्या प्रक्रिया कायदेशीररित्या पार पाडल्या गेल्या. तपासात आढळलेल्या पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपींना NCB कोठडी सुनावली होती. विविध प्रकारचे अंमली पदार्थ सापडले होते. NCB वर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कारवाई दरम्यान तात्काळ साक्षीदार तयार करावे लागतात.

२ तारखेआधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हतो. एकूण १४ जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन एनसीबी कार्यालयात आणले गेले. यापैकी ६ जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले. या कारवाईनंतर ६ ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाई १० जणांना अटक केली गेली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते. किरण गोसावी यांनी जे सांगितले तेच आम्ही नोंदवले. तसेच एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी NCB कोणताही राजकीय पक्ष आणि जात, धर्म पाहून काम करत नाही असे स्पष्ट केले. सोडण्यात आलेल्या ६ जणांची नावे देता येणार नाही.  प्रकरण कोर्टात सुरु आहे. आम्ही पुराव्याच्या आधारावर बोलतो. आम्हाला जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार. कोर्ट सांगेल त्याप्रमाणे आम्ही करू असे वानखेडे यांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोAryan Khanआर्यन खानnawab malikनवाब मलिक