शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

कर्जत-खांडस गावातील एकाची हत्या; ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 1:46 AM

पाण्याची पाइपलाइन टाकण्यावरून झाला होता वाद

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस येथे नळपाणी योजनेची पाइपलाइन टाकण्याच्या कामात अडथळा ठरत असलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीची ऐनघर कुटुंबातील सदस्यांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे आणि ते जंगलात पळून गेले होते. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात याप्रकरणी ११ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे.

कर्जत तालुक्यातील खांडस गावात नळपाणी योजनेचे पाइपलाइन टाकण्यावरून शिवाजी पाटील यांनी हरकत घेतली होती. या ठिकाणी आपल्याला घर बांधायचे असून पाइपलाइन टाकू नका, अशी सूचना पाटील यांनी केली. त्यामुळे पाइपलाइनचे काम करणाऱ्या ऐनकर कुटुंबाला याचा राग आला. या सर्वांनी ४ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवली आणि पाइपलाइन टाकायला हरकत घेणारे शिवाजी पाटील यांना मनोहर ऐनकर, जनार्दन ऐनकर, विठ्ठल ऐनकर, प्रकाश ऐनकर, बाळाराम ऐनकर आणि पुंडलिक ऐनकर यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरू असताना विलास ऐनकर याने लोखंडी टिकावाच्या साहाय्याने तर मच्छींद्र ऐनकर यांनी फावड्याने शिवाजी गोविंद पाटील यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली. कैलाश ऐनकर आणि जगदीश ऐनकर या दोघांनी चाकूने शिवाजी पाटील यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले आणि शेवटी गणेश ऐनकर याने डोक्यात तलवारीने घाव घातला आणि सर्व जण फरार झाले.

या मारहाणीमुळे शिवाजी पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना त्यांचे वडील गोविंद पाटील यांनी मुलाला उचलून खांडस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले; परंतु प्रचंड रक्तस्रावामुळे खांडस प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, पनवेलकडे जाताना रस्त्यातच शिवाजी यांचा मृत्यू झाला.आरोपींना पकडण्यात नेरळ पोलिसांना यशघटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस खांडस गावात पोहोचले. तेव्हा जखमीला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, जखमी शिवाजी पाटील यांचा या हाणामारीत मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना समजले. खून करून पळालेल्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवातके ली.४ मेच्या रात्री तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर ५ मे रोजी दिवसभरात सर्व ११ जणांना पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस