शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; राज्य महिला आयोगाचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 4:27 PM

मीरा रोडमधील या घटनेने महाराष्ट्रासह संपू्र्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे.

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

मीरा रोडमधील या घटनेने महाराष्ट्रासह संपू्र्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. तसेच, रुपाली चाकणकर स्वतः या संदर्भात पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

सदरील घटना ही अंगावर शहारे आणणारी व संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आहेत.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागांने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.आणि सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असा आदेश देण्यात आले आहे.

भाईंदर पूर्वेला उड्डाणपुलाखाली शिधावाटप कार्यालयासमोर गीतानगर फेज ७ आहे. येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने तसेच संशयास्पद हालचालींमुळे रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले. 

दहा वर्षांपासून होते प्रेमसंबंध

सहानी याचे रेशनचे दुकान असून त्याचे व सरस्वतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते.

वालकर हत्याकांडातून सुचली कल्पना

सरस्वतीची हत्या करून पुरावे नष्ट करायचे असल्याने तिच्या शरीराचे असंख्य तुकडे साहनी याने कटरने केले. सरस्वती हिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना त्याला श्रद्धा वालकर हत्याकांडातून  सुचल्याचे त्याने सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Mira Road Murderमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिस