शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

नात्याला काळीमा! जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून घेतला पत्नीचा जीव; मुलगा गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:56 IST

Crime News : वणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जलालपूर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोशिंबीरीसाठी पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुरली सिंह असं आरोपी पतीचं नाव आहे. मुरली सिंह नेहमीप्रमाणे आपल्या घरी जेवत होता. त्यावेळी त्याच्या पत्नीने ताटात कोशिंबीर वाढली नाही. त्यामुळे त्याचा पारा चढला आणि संतापाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. हातातील कुदळीने पत्नीवर प्रहार केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला 20 वर्षीय मुलगा अजय गंभीर जखमी झाला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घरात पाहिलं असता पत्नी आणि मुलगा जखमी अवस्थेत दिसले. त्या दोघांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच महिलेचा मृत्यू झाला होता. तर मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बाबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

प्रेम केलं म्हणून दिली अघोरी शिक्षा! मुंडण केलं, चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवलं; घटनेने खळबळ

अनेक भयंकर घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून एका तरुणाला अघोरी शिक्षा केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने गावातील एका मुलीवर केलं म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचं जबरदस्तीने मुंडण केलं, गळ्यात चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये ही संतापजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील दमन खामरिया गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राज कुमार देहरिया या व्यक्तीने हे आरोप केले असून याबाबत तक्रार दाखल केली आहे. देहरिया याने आपल्या तक्रारीत आपलं जबरदस्तीने मुंडण केलं. साखळीने बांधलं, गळ्यात चपलांचा हार घातला आणि संपूर्ण गावात फिरवलं असल्याचं म्हटलं आहे. गावातल्या एका मुलीवर प्रेम होतं. तिच्याच घरच्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तसेच आरोपींनी या घटनेचा एक व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूIndiaभारत