शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नात्याला काळीमा! जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून घेतला पत्नीचा जीव; मुलगा गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:56 IST

Crime News : वणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जलालपूर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोशिंबीरीसाठी पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुरली सिंह असं आरोपी पतीचं नाव आहे. मुरली सिंह नेहमीप्रमाणे आपल्या घरी जेवत होता. त्यावेळी त्याच्या पत्नीने ताटात कोशिंबीर वाढली नाही. त्यामुळे त्याचा पारा चढला आणि संतापाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. हातातील कुदळीने पत्नीवर प्रहार केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला 20 वर्षीय मुलगा अजय गंभीर जखमी झाला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घरात पाहिलं असता पत्नी आणि मुलगा जखमी अवस्थेत दिसले. त्या दोघांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच महिलेचा मृत्यू झाला होता. तर मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बाबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

प्रेम केलं म्हणून दिली अघोरी शिक्षा! मुंडण केलं, चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवलं; घटनेने खळबळ

अनेक भयंकर घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून एका तरुणाला अघोरी शिक्षा केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने गावातील एका मुलीवर केलं म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचं जबरदस्तीने मुंडण केलं, गळ्यात चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये ही संतापजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील दमन खामरिया गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राज कुमार देहरिया या व्यक्तीने हे आरोप केले असून याबाबत तक्रार दाखल केली आहे. देहरिया याने आपल्या तक्रारीत आपलं जबरदस्तीने मुंडण केलं. साखळीने बांधलं, गळ्यात चपलांचा हार घातला आणि संपूर्ण गावात फिरवलं असल्याचं म्हटलं आहे. गावातल्या एका मुलीवर प्रेम होतं. तिच्याच घरच्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तसेच आरोपींनी या घटनेचा एक व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूIndiaभारत