शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:40 IST

Mainpuri Family Suicide Case: या घटना पाहून गावकरी भूतबाधेचा संशय व्यक्त करत आहेत.

Mainpuri Family Suicide Case: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १७ वर्षात एकाच कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ताजी घटना शुक्रवारी घडली, ज्यात कुटुंबातील १८ वर्षीय जितेंद्रने झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत या कुटुंबात आत्महत्येची ही चौथी घटना आहे. २१ दिवसांपूर्वीच, जितेंद्रच्या काकांनीही आत्महत्या केली होती. 

झाडाला लटकलेला मृतदेह...मैनपुरी जिल्ह्यातील बेवार पोलीस स्टेशन परिसरातील सकट बेवार गावातील रहिवासी हिरालाल यांचा नातून जितेंद्र याने गेल्या शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबात आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याची ही सातवी घटना होती. हिरालाल यांनी सांगितले की, माझा नातू जितेंद्र सकाळी १० वाजता जेवण करुन शेतात गेला होता. त्याने सांगितले होते की, थोड्या वेळाने परत येईल. पण बराच वेळ तो परतला नाही, तेव्हा जितेंद्रचे वडील रामबरन त्याला शोधण्यासाठी शेतात गेले. दुपारी २ वाजता गावाबाहेर एका शेतात जितेंद्रचा मृतदेह फासावर लटकलेला असल्याची माहिती मिळाली. 

...आणखी किती लोक मरणारमुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई रडत घटनास्थळी पोहोचली. मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला. 'अरे देवा, तू माझा मुलगा का घेऊन गेलास? काही दिवसांपूर्वी माझी मुलगीही मरण पावली. माझा मेहुणाही मरण पावला...आणखी किती लोक मरणार?' असे म्हणत ती बेशुद्ध पडली. लोकांनी तिला कसेबसे सांभाळले. विशेष म्हणजे, २१ दिवसांपूर्वीच जितेंद्रचे काका बलवंतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जितेंद्रची सख्खी बहीण सौम्यानेही ४ महिन्यांपूर्वी घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. तर, जितेंद्रचा चुलत भाऊ बाबा शेर सिंगनेही साडेचार महिन्यांपूर्वी गळफास घेतला होता. 

तसेच, ५ वर्षांपूर्वी २०२० मध्ये काका मनीषने आणि ८ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये जितेंद्रचा दुसरा काका पिंटूनेही स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. याशिवाय, १० वर्षांपूर्वी २०१५ मध्ये जितेंद्रचे काका संजू यांनीदेखील विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याआधीही कुटुंबातील सुरजपाल, महिपाल आणि रामसिंग यांनीही आत्महत्या केल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे.

गावकऱ्यांमध्ये दहशतएकाच कुटुंबात इतक्या लोकांनी आत्महत्या केल्याने गावातील लोकही घाबरले आहेत. काही ग्रामस्थांचा असा विश्वास आहे की, हिरालालच्या घरात भूतबाधा आहे, ज्यामुळे हे लोक आत्महत्या करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारPoliceपोलिस