शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
3
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
4
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
5
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
6
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
7
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
8
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
9
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
10
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
11
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
12
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
13
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
14
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
15
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची सीएनजी कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
16
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
17
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
18
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
19
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
20
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच

एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:40 IST

Mainpuri Family Suicide Case: या घटना पाहून गावकरी भूतबाधेचा संशय व्यक्त करत आहेत.

Mainpuri Family Suicide Case: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १७ वर्षात एकाच कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ताजी घटना शुक्रवारी घडली, ज्यात कुटुंबातील १८ वर्षीय जितेंद्रने झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत या कुटुंबात आत्महत्येची ही चौथी घटना आहे. २१ दिवसांपूर्वीच, जितेंद्रच्या काकांनीही आत्महत्या केली होती. 

झाडाला लटकलेला मृतदेह...मैनपुरी जिल्ह्यातील बेवार पोलीस स्टेशन परिसरातील सकट बेवार गावातील रहिवासी हिरालाल यांचा नातून जितेंद्र याने गेल्या शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबात आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याची ही सातवी घटना होती. हिरालाल यांनी सांगितले की, माझा नातू जितेंद्र सकाळी १० वाजता जेवण करुन शेतात गेला होता. त्याने सांगितले होते की, थोड्या वेळाने परत येईल. पण बराच वेळ तो परतला नाही, तेव्हा जितेंद्रचे वडील रामबरन त्याला शोधण्यासाठी शेतात गेले. दुपारी २ वाजता गावाबाहेर एका शेतात जितेंद्रचा मृतदेह फासावर लटकलेला असल्याची माहिती मिळाली. 

...आणखी किती लोक मरणारमुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई रडत घटनास्थळी पोहोचली. मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला. 'अरे देवा, तू माझा मुलगा का घेऊन गेलास? काही दिवसांपूर्वी माझी मुलगीही मरण पावली. माझा मेहुणाही मरण पावला...आणखी किती लोक मरणार?' असे म्हणत ती बेशुद्ध पडली. लोकांनी तिला कसेबसे सांभाळले. विशेष म्हणजे, २१ दिवसांपूर्वीच जितेंद्रचे काका बलवंतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जितेंद्रची सख्खी बहीण सौम्यानेही ४ महिन्यांपूर्वी घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. तर, जितेंद्रचा चुलत भाऊ बाबा शेर सिंगनेही साडेचार महिन्यांपूर्वी गळफास घेतला होता. 

तसेच, ५ वर्षांपूर्वी २०२० मध्ये काका मनीषने आणि ८ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये जितेंद्रचा दुसरा काका पिंटूनेही स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. याशिवाय, १० वर्षांपूर्वी २०१५ मध्ये जितेंद्रचे काका संजू यांनीदेखील विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याआधीही कुटुंबातील सुरजपाल, महिपाल आणि रामसिंग यांनीही आत्महत्या केल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे.

गावकऱ्यांमध्ये दहशतएकाच कुटुंबात इतक्या लोकांनी आत्महत्या केल्याने गावातील लोकही घाबरले आहेत. काही ग्रामस्थांचा असा विश्वास आहे की, हिरालालच्या घरात भूतबाधा आहे, ज्यामुळे हे लोक आत्महत्या करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारPoliceपोलिस