शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:40 IST

Mainpuri Family Suicide Case: या घटना पाहून गावकरी भूतबाधेचा संशय व्यक्त करत आहेत.

Mainpuri Family Suicide Case: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १७ वर्षात एकाच कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ताजी घटना शुक्रवारी घडली, ज्यात कुटुंबातील १८ वर्षीय जितेंद्रने झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत या कुटुंबात आत्महत्येची ही चौथी घटना आहे. २१ दिवसांपूर्वीच, जितेंद्रच्या काकांनीही आत्महत्या केली होती. 

झाडाला लटकलेला मृतदेह...मैनपुरी जिल्ह्यातील बेवार पोलीस स्टेशन परिसरातील सकट बेवार गावातील रहिवासी हिरालाल यांचा नातून जितेंद्र याने गेल्या शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबात आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याची ही सातवी घटना होती. हिरालाल यांनी सांगितले की, माझा नातू जितेंद्र सकाळी १० वाजता जेवण करुन शेतात गेला होता. त्याने सांगितले होते की, थोड्या वेळाने परत येईल. पण बराच वेळ तो परतला नाही, तेव्हा जितेंद्रचे वडील रामबरन त्याला शोधण्यासाठी शेतात गेले. दुपारी २ वाजता गावाबाहेर एका शेतात जितेंद्रचा मृतदेह फासावर लटकलेला असल्याची माहिती मिळाली. 

...आणखी किती लोक मरणारमुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई रडत घटनास्थळी पोहोचली. मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला. 'अरे देवा, तू माझा मुलगा का घेऊन गेलास? काही दिवसांपूर्वी माझी मुलगीही मरण पावली. माझा मेहुणाही मरण पावला...आणखी किती लोक मरणार?' असे म्हणत ती बेशुद्ध पडली. लोकांनी तिला कसेबसे सांभाळले. विशेष म्हणजे, २१ दिवसांपूर्वीच जितेंद्रचे काका बलवंतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जितेंद्रची सख्खी बहीण सौम्यानेही ४ महिन्यांपूर्वी घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. तर, जितेंद्रचा चुलत भाऊ बाबा शेर सिंगनेही साडेचार महिन्यांपूर्वी गळफास घेतला होता. 

तसेच, ५ वर्षांपूर्वी २०२० मध्ये काका मनीषने आणि ८ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये जितेंद्रचा दुसरा काका पिंटूनेही स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. याशिवाय, १० वर्षांपूर्वी २०१५ मध्ये जितेंद्रचे काका संजू यांनीदेखील विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याआधीही कुटुंबातील सुरजपाल, महिपाल आणि रामसिंग यांनीही आत्महत्या केल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे.

गावकऱ्यांमध्ये दहशतएकाच कुटुंबात इतक्या लोकांनी आत्महत्या केल्याने गावातील लोकही घाबरले आहेत. काही ग्रामस्थांचा असा विश्वास आहे की, हिरालालच्या घरात भूतबाधा आहे, ज्यामुळे हे लोक आत्महत्या करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारPoliceपोलिस