बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 10:20 PM2021-09-12T22:20:14+5:302021-09-12T22:36:18+5:30

Crime News : लग्नानंतर राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला.

looteri dulhan news bride escaped after cheating husband after marriage in mainpuri | बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. नववधूने रस्त्यातच तहान लागल्याच कारण देत नवरदेवाला चकवा देत पळ काढला आहे. खूप शोधल्यानंतरही तिचा पत्ताच लागला नाही आणि या फसवणुकाची हा प्रकार उघड झाला. पीडित तरूण आणि त्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पसार झालेल्या नववधूचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील करहल चौकात राहणाऱ्या तरुणीने कस्बा मार्गावर राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. तरुण लग्न करून नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचला. त्यावेळी तरुणी त्याला फसवून कॅश, ज्वेलरी घेऊन बेपत्ता झाली. या घटनेनंतर नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक व्यक्ती मुलीचं लग्नाचं स्थळ घेऊन आले होते. पीडित तरुणाचे वडील राजेंद्र यांनी लग्नासाठी परवानगी दिली. मात्र या लग्नात मुलीला 80 हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. दोघांनीही हे मान्य केलं. शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या एका महिलेने ठराविक रक्कम घेतल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी तरुणीसोबत लग्न केलं. 

नवरी जोमात, नवरदेव कोमात! 

राजेंद्रने आपल्या सुनेला सोन्याचे दागिने दिले. लग्नानंतर सायंकाळी राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला. परत येऊन पाहिलं तर नवरी गायब झाली होती. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर राजूचे वडील राजेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. करहल रोड येथे राहणाऱ्या महिलेने धोका दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला

प्रेमात धोका मिळाल्याने एका प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट प्रियकराचाच काटा काढला आहे. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने त्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. यानंतर महिलेने प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.  

 

Web Title: looteri dulhan news bride escaped after cheating husband after marriage in mainpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.