शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

युवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:30 PM

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्दे देविदास चव्हाण, अविनाश , मुकेश व पुतण्या गणेश हे चौघे चार चाकी वाहनामध्ये नाईक नगर येथील आपल्या घरासमोर पोहचले.चौघेही कारमधून खाली उतरताच त्यांचेवर हल्ला करून चौघांनाही सुमारे १५० फुटापर्यंत ओढत नेले. आरोपिंनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अविनाश चव्हाण हा जागेवरच ठार झाला.

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोघांना निर्दोष ठरविण्यात आले तर एकाचा कारागृहातच नैसर्गिक मृत्यू झाला होता. २० आरोपिंना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची ही घटना बहुधा विदभार्तील पहिलीच असू शकते.सोमनाथ नगर (ता. मानोरा जि. वाशिम) येथील देविदास दुधराम चव्हाण यांनी सन २०१२ मध्ये सरपंच मिलींद मधुकर चव्हाण व जनार्दन रामधन राठोड यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल केले होते. परंतू देविदास चव्हाण यांना कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी या दोघांना न विचारता नामनिर्देशपत्र परत घेतले. यामुळे देविदास चव्हाण यांचे सरपंच मिलींद चव्हाण व जनार्दन राठोड यांचेसोबत राजकीय वैमनस्य निर्माण झाले. दरम्यान, १८ मार्च २०१४ रोजी देविदास चव्हाण हे आपला मुलगा अविनाश, मुकेश व पुतण्या गणेश यांचेसोबत मानोरा येथून दुपारी सोमनाथ नगर येथे बंजारा समाजाच्या होळी सनानिमित्त गेले होते. आरोपी सरपंच मिलींद चव्हाण व जनार्दन राठोड हे दोघे देविदास चव्हाण यांच्या घरासमोर डि.जे. वाजवत होते. यावेळी देविदास चव्हाण व त्यांची दोन मुले अविनाश , मुकेश यांनी डि.जे. वाजवण्यास मनाई केली. त्यानंतर डी.जे. बंद करून देविदास चव्हाण यांच्या कुटूंबाला संपविण्याचा कट रचला. दुपारी ४ वाजताचे सुमारास देविदास चव्हाण, अविनाश , मुकेश व पुतण्या गणेश हे चौघे चार चाकी वाहनामध्ये नाईक नगर येथील आपल्या घरासमोर पोहचले. त्याआधिच विरूध्द गटाचे लोक दबा धरून बसले होते. चौघेही कारमधून खाली उतरताच त्यांचेवर हल्ला करून चौघांनाही सुमारे १५० फुटापर्यंत ओढत नेले. त्याठिकाणी आरोपिंनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अविनाश चव्हाण हा जागेवरच ठार झाला. देविदास, मुकेश व गणेश हे तिघे गंभीर जखमी झाले.या घटनेची निर्मलाबाई चव्हाण यांनी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फियार्दीहून सरपंच मिलींद मधुकर चव्हाण , सुदाम उर्फ सुधाकर एस. चव्हाण, जनार्धन रामधन राठोड, दुर्योधन रामधन राठोड, गोवर्धन हरिधन राठोड, ज्ञानेश्वर बब्बूसिंग राठोड, विश्वनाथ फकीरा जाधव, बंडू फकीरा जाधव, किसन गोवर्धन आडे, कोमल बाबुसिंग आडे, कुलदीप रामलाल पवार, अरूण रामलाल पवार, रविंद्र तुळशिराम राठोड, अशोक रामलाल पवार, विनोद हरिधन राठोड, मनोहर तुळशिराम राठोड, दिलीप दलसिंग राठोड, बाबुसिंग रामजी राठोड, सदाशिव लिंबाजी जाधव, रामधन मेरसिंग राठोड, मधुकर भोजू चव्हाण, प्रदिप बाबुलाल जाधव, शिवराम भोजू चव्हाण यांचेविरूध्द भादंवी ३०२, ३०७, १४७, १४८ कलम १३५ मुंबई पो. अ?ॅक्ट , १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.या घटनेचा संपुर्ण तपास करून मानोरा पोलीसांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासले.साक्षीपुराव्यावरून न्यायाधिश पराते यांनी २२ पैकी २० आरोपींना कलम ३०२, १४९ मध्ये जन्मठेप व प्रत्येकी १० हजार दंड ठोठावला. अन्य दोघांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. या संपुर्ण प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून वाशिम येथील उदय देशमुख यांची नेमणूक करण्यात आली होती.

 

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाManoraमानोराLife Imprisonmentजन्मठेप