शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कोरेगाव-भीमा प्रकरण : केंद्राच्या पत्राशिवाय कागदपत्रे सुपूर्द न करण्यास सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:08 PM

मुख्यमंत्र्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

ठळक मुद्देपोलीस महासंचालक सुबोध जायसवाल आणि राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा करुन या प्रकरणाचा पुर्ण आढावा घेतला.पुण्यात झालेली एल्गार परिषद व त्यानंतर झालेल्या दंगलीवेळी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

मुंबई : कोरेगाव -भीमा दंगल प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) उत्सुक असलीतरी त्याबाबतची गुंतागुत वाढत चालली आहे. दंगलीचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याबाबत केंद्राकडून अधिकृतपणे कळविण्यात न आल्याने याप्रकरणाचा दस्ताऐवज तुर्तास दुसऱ्या यंत्रणेकडे न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी याप्रकरणी गृहसचिवांसह पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल आणि राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा करुन या प्रकरणाचा पुर्ण आढावा घेतला. 

एल्गार परिषद प्रकरणी प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने

पुण्यात झालेली एल्गार परिषद व त्यानंतर झालेल्या दंगलीवेळी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. राज्य घटनेने राज्य सरकारकडे असलेले अधिकार आणि कायद्याच्या अधीन राहून याप्रकरणी भूमिका निश्चित करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे याबाबत सावधगिरीने पावले उचलण्यात येत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.

एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयए'ची टीम पुण्यात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासामध्ये पूर्वगृह दुषित ठेवून निरपराधावर कारवाई केली आहे, असा आक्षेप घेत याबाबत विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन करुन तपास करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या गुन्ह्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) परस्पर सोपविला आहे.मात्र, राज्य सरकारने त्याबाबत केंद्राशी असहकार्य करीत आपल्या अधिकाराचा पुर्ण वापर करण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून पूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. केंद्राच्या दबावाला न पडता घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे याबाबत भूमिका घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारRashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा