शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फसव्या योजनांपासून सावध राहणे गरजेचे; पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे काही उरत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:12 IST

दामदुप्पट करण्याच्या आमिषाने पैसे गुंतवणाऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अशा प्रकारच्या फसव्या योजनांपासून चार हात लांब राहणे आणि सावध राहणे गरजेचे आहे.

प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक

दामदुप्पट करण्याच्या आमिषाने पैसे गुंतवणाऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अशा प्रकारच्या फसव्या योजनांपासून चार हात लांब राहणे आणि सावध राहणे गरजेचे आहे.

‘टोरेस ज्वेलर्स’ या दुकानसाखळीने आतापर्यंत २५ हजार लोकांची फसवणूक करत हजारो कोटींची रक्कम गडप केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडून सात कोटी रुपये हस्त केले आहेत. मात्र, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांची एक मोडस ऑपरेंडी ठरलेली असते.

एखादी अपरिचित व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी जागा भाड्याने घेते व जाहिरात करते की, तुम्ही जेवढी रक्कम त्याच्या योजनेत गुंतवाल तेवढ्या रकमेवर बँकेतील ठेवलेल्या मुदतीच्या ठेवींच्या दरांपेक्षा  दुप्पट दर असेल. त्याशिवाय घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोहोच मिळतील.

आठ ते नऊ महिन्यांनंतर दर महिन्याला मिळणारे व्याज मिळेनासे होते. तक्रार केल्यास ठेवी स्वीकारणारी व्यक्ती भेटायला टाळाटाळ करते. वर्षभरात ही व्यक्ती एक दिवस अचानक नाहीशी होते व भाड्याने घेतलेली जागा रिकामी झालेली असते. आर्थिक फसवणूक करणारी व्यक्ती तोपर्यंत परदेशात गेलेली असते व जाताना अनेकांनी ठेवलेल्या रकमा गायब झालेल्या असतात.  त्यानंतर आपण फसवले गेलो आहोत, हे लक्षात आले की असे लोक पोलिसांकडे तक्रार करतात. पोलिसांच्या प्रयत्नांनी फसवणूक करणारी व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर पकडली गेली तरीही ठेवलेल्या रकमा परत मिळणे दुरापास्त होऊन बसते. ही होणारी फसवणूक ‘पाँझी स्कीम’ नावाने प्रसिद्ध आहे.

उपाय काय?

  • प्रत्येक पोलिस आयुक्तालयात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पोलिस उपायुक्त नेमलेला आहे. फार मोठ्या रकमेची अफरातफर असेल तर त्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आर्थिक गुन्ह्याच्या तपासाचे काम दिले आहे. त्याशिवाय घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोहोच मिळतील. 
  • अपराधी व्यक्ती पकडल्यानंतर त्याच्याकडील रकमेतून त्याने काही स्थावर मालमत्ता केली असल्यास ती जप्त करून येणाऱ्या पैशांतून पीडित व्यक्तींना ही रक्कम परत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून शिक्षा होण्यापेक्षा पीडित व्यक्तीस गेलेली रक्कम परत मिळणे जास्त महत्त्वाचे असते.
  • शासनातर्फे वरील व्यवस्था राबवलेली असली तरीही कष्टाने मिळवलेले पैसे अशा प्रकारे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता दूर राहणे हे शहाणपणाचे आहे. 
  • भारत सरकारतर्फे व रिझर्व्ह बँकेनेही अशा अपराधी व्यक्तींविरुद्ध कडक तरतुदी केल्या आहेत; परंतु तरीही अशा प्रकारे फसवणारे व त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक ठिकठिकाणी वारंवार नजरेस येत असतात. 
  • आर्थिक सुशिक्षितता, सावधानता बाळगून, शासनमान्य शेड्यल्ड बँका, म्युच्युअल फंड या ठिकाणी रक्कम गुंतवणे योग्य आहे; अन्यथा पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.
टॅग्स :torres scamटोरेस घोटाळाPoliceपोलिस