ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:27 IST2025-06-26T13:26:49+5:302025-06-26T13:27:49+5:30
नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. लग्न हे असं बंधन आहे, जे आयुष्यभरासाठी निभावावं लागतं. परंतु, हाच एक निर्णय जर चुकला तर आयुष्याची माती होते, असे म्हणतात. लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो आणि प्रत्येकाला आपला जोडीदार परिपूर्ण असावा असे वाटते. अनेकदा लग्नानंतरही नाती तुटतात, त्यामुळे लोक आपला जोडीदार निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींची चौकशी करतात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. मात्र, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका नवरदेवाने लग्नापूर्वीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नवरदेवाला वधू पसंत नव्हती, तरीही मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून नवरदेवाने गळफास लावून आपले जीवन संपवले. मृत्यूपूर्वी, तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की, "मला त्यांची मुलगी आवडत नाही, तरीही हे लोक लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे त्रस्त होऊन मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला कटरा समानमधून आलेले ८-१० लोक जबाबदार आहेत, जे मला त्रास देत आहेत आणि पैशाची धमकी देत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही लग्न करूनच जाऊ. या लोकांमुळेच मी माझा जीव देत आहे."
ही घटना आग्रा येथील दन्नाहार पोलीस स्टेशन परिसरातील महटौली गावातील आहे. येथे विक्रम राठौरच्या लग्नाची बोलणी कटरा समान येथे राहणाऱ्या एका मुलीशी सुरू होती. विक्रमने मुलीची उंची कमी असल्यामुळे लग्नास नकार दिला होता, परंतु मुलीकडील लोक त्याच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होते.
मुलीकडील लोक लग्नासाठी टाकत होते दबाव!
बुधवारीही कटरा समानमधील लोक शेजारील गाव डांडेहारच्या काही लोकांसह विक्रमच्या घरी महटौली येथे आले. सर्वजण त्याच्यावर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकू लागले. यामुळे त्रस्त होऊन विक्रम शेतात गेला. तेथे त्याने आपल्या मोबाईलवर एक सुसाइड नोट लिहिली आणि ती फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर १० मिनिटांनी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
वडिलांनी दुसरीकडे ठरवले होते लग्न
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. वडिलांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचे लग्न दुसरीकडे ठरवले होते आणि कटरा समानचे लोक जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होते. याच त्रासातून त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.