शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

कर्ज देण्याच्या नावाखाली ८०० शेतकऱ्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:50 AM

अहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले.

मनीषा म्हात्रे -मुंबई : पडिक जमिनींसह शेतीवर कमी व्याजाने ६ ते २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देणाºया एका लोभस योजनेला फसून राज्यातील ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी त्यात गुंतवणूक केली. मात्र ही योजना घेऊन आलेले ठग निघाल्याने शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. फसल्या गेलेल्या बीडच्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने याबाबत मुंबई पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी नवनाथ श्रीहरी वायकर (२३) याच्या तक्रारीवरून पोलीस या रॅकेटचा शोध घेत आहेत. त्याचे आईवडील शेतकरी आहेत. घराच्या हलाकीच्या परिस्थितीतही नवनाथ बी.एस.सीच्या द्वित्तीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. घरच्यांना हातभार लावण्यासाठी तो नोकरीच्या शोधात असताना, ३० जानेवारीला एका दैनिकात त्याने, ‘लाईफ इन्फो केअर कंपनीच्या अ‍ॅग्रीकल्चरल लोन, होम लोन, बिझनेस लोन व प्रोजेक्टर लोन इत्यादी लोनसाठी तालुका स्तरावर सेल्स रिप्रझेन्टेटीव्ह नेमणे आहे’ अशी जाहिरात पाहिली. ती पाहून तो कामावर रुजू झाला होता. 

 शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण, आतापर्यंत ५७ जणांच्या तक्रारीअहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले. २६ जुलै रोजी ४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानुसार शेतकरी गोळा झाले. मात्र कर्मचारी आलेच नाहीत. त्यानंतर मुंबईतील कार्यालय, मोबाईल बंद करुन पसार झाले. मुंबईतील दाखल गुन्ह्यात नगरसह बीड येथील ५७ जणांच्या तक्रारी आतापर्यंत दाखल आहेत. यात प्रत्येकी २१ ते ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.वायकरसारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा वापर करत अशाप्रकारे राज्यभरातील ८०० हून अधिक शेतकºयांना गंडविले आहे. त्यापैकी काही जण तक्रारीसाठी पुढे येत आहे. तर, काही जण अजूनही पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा आकडा आणखी मोठा असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.पैसेही गेले आणि कागदपत्रेही...कर्जासाठी शेतकºयांच्या जमिनीचा ७/१२, ८ अ, आधारकार्ड, पॅनकार्ड व वैयक्तिक बचत खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा ३ हजार ९७० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. यात पैसे तर नाही पण त्यांची कागदपत्रेही ठगांकडे आहेत. त्यामुळे कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची भीती त्यांना सतावत आहे.अद्याप अटक नाही...याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. संबंधित कर्मचारी, अधिकाºयांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे गुन्हे अधिकारी धनंजय लिगाडे यांनी दिली.अशी झाली नवनाथची फसवणूकबीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी असलेल्या नवनाथ श्रीहरी वायकर (२३) या तरुणाने कंपनीने शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली राज्यातील ८०० शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळेल म्हणून त्याने एका दैनिकात जाहिरात पाहून सदर कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवनाथने पोलिसांत धाव घेतली.आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वासआईवडिलांना मदत व्हावी, शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून पुढाकार घेतला. आधी बेरोजगारीने त्रस्त होतो त्यात, आता यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकीमुळे धक्काच बसला आहे. याबाबत मीच पुढाकार घेत तक्रार केली. आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वास आहे. ते लवकरात लवकर आरोपींना पकडून आमचे पैसे मिळवून देतील ही अपेक्षा आहे. माझ्यासारखे आठशे शेतकरी यात फसल्याचे नवनाथ वायकरने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी