शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:45 IST

अन्य घटकातील पात्र इच्छुकांवर अन्याय

ठळक मुद्देगेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती.

मुंबई : विशेष सुरक्षा दलात (एसपीयू)मध्ये प्रतिनियुक्तीसाठी निश्चित केलेल्या मनुष्यबळाहून अधिकजण कार्यरत असतानाही पुन्हा तेथीलच जवानांना पाचारण करण्याचा अजब प्रकार घडला आहे. राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) नवी मुंबई ( गट क्रमांक ११) येथील आठ जवानांना पुन्हा प्रतिनियुक्तीसाठी निवड करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एसआरपीच्या अप्पर महासंचालकांनी सूचना करुनही एसपीयूच्या अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या अन्य पात्र इच्छुकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अति महत्वाच्या व्यक्ती, सत्ताधारी, राजकारणांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘एसपीयु’कडून अंगरक्षक (बॉडीगार्ड) पुरविले जातात. त्यांना असलेला धोका आणि त्याचे महत्वपाहून त्यासाठी बॉडीगार्डची निश्चिती केली जात असून विविध पोलीस घटकातील अंमलदार, अधिकाऱ्यांची पाच वर्षासाठी प्रतिनियुक्ती केली जाते. संबंधितांना नियमित वेतनाहून ३० टक्के अधिक अधिक भत्ता दिला जातो, त्याशिवाय २४ तास ड्युटीनंतर २४ तासाची ‘ऑफ’ मिळतो. त्यामुळे त्याठिकाणी प्रतिनियुक्तीसाठी अनेकजण इच्छुक असतात. एसपीयूकडून बऱ्याच वर्षानंतर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये पुण्यात एसआरपीच्या मैदानावर शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्याबाबतचा निकाल जाहीर करण्यास विलंब लावण्यात आला. ‘लोकमत’नेही ही बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी विशेष शाखेतील ५ वर्षाहून अधिक कालावधीत पुर्ण झालेल्या काहीजणांना परत पाठविण्यात आले होते. त्यानंतर अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी १० जानेवारीला एसआरपीच्या विविध गटातील २९ जणांना प्रतिनियुक्तीसाठी निवड केली आहे. त्यामध्ये नवी मुंबईच्या पथकातील ८ जणांचा समावेश आहे. वास्तविक एसपीयूसाठी या पथकातील १११ मंजूर पदे असताना १३०जण कार्यरत आहेत. तरीही आणखी आठजणांना पाचारण केले आहे. त्याउलट अन्य पथकातील मंजूर पदापेक्षा कमी भरती केली असताना त्यांची निवड करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती. मात्र तरीही विशेष सुरक्षा शाखेच्या प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे अन्य इच्छुक पात्र जवानावर अन्याय झालेला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई