शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:45 IST

अन्य घटकातील पात्र इच्छुकांवर अन्याय

ठळक मुद्देगेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती.

मुंबई : विशेष सुरक्षा दलात (एसपीयू)मध्ये प्रतिनियुक्तीसाठी निश्चित केलेल्या मनुष्यबळाहून अधिकजण कार्यरत असतानाही पुन्हा तेथीलच जवानांना पाचारण करण्याचा अजब प्रकार घडला आहे. राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) नवी मुंबई ( गट क्रमांक ११) येथील आठ जवानांना पुन्हा प्रतिनियुक्तीसाठी निवड करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एसआरपीच्या अप्पर महासंचालकांनी सूचना करुनही एसपीयूच्या अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या अन्य पात्र इच्छुकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अति महत्वाच्या व्यक्ती, सत्ताधारी, राजकारणांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘एसपीयु’कडून अंगरक्षक (बॉडीगार्ड) पुरविले जातात. त्यांना असलेला धोका आणि त्याचे महत्वपाहून त्यासाठी बॉडीगार्डची निश्चिती केली जात असून विविध पोलीस घटकातील अंमलदार, अधिकाऱ्यांची पाच वर्षासाठी प्रतिनियुक्ती केली जाते. संबंधितांना नियमित वेतनाहून ३० टक्के अधिक अधिक भत्ता दिला जातो, त्याशिवाय २४ तास ड्युटीनंतर २४ तासाची ‘ऑफ’ मिळतो. त्यामुळे त्याठिकाणी प्रतिनियुक्तीसाठी अनेकजण इच्छुक असतात. एसपीयूकडून बऱ्याच वर्षानंतर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये पुण्यात एसआरपीच्या मैदानावर शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्याबाबतचा निकाल जाहीर करण्यास विलंब लावण्यात आला. ‘लोकमत’नेही ही बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी विशेष शाखेतील ५ वर्षाहून अधिक कालावधीत पुर्ण झालेल्या काहीजणांना परत पाठविण्यात आले होते. त्यानंतर अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी १० जानेवारीला एसआरपीच्या विविध गटातील २९ जणांना प्रतिनियुक्तीसाठी निवड केली आहे. त्यामध्ये नवी मुंबईच्या पथकातील ८ जणांचा समावेश आहे. वास्तविक एसपीयूसाठी या पथकातील १११ मंजूर पदे असताना १३०जण कार्यरत आहेत. तरीही आणखी आठजणांना पाचारण केले आहे. त्याउलट अन्य पथकातील मंजूर पदापेक्षा कमी भरती केली असताना त्यांची निवड करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती. मात्र तरीही विशेष सुरक्षा शाखेच्या प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे अन्य इच्छुक पात्र जवानावर अन्याय झालेला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई