शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:45 IST

अन्य घटकातील पात्र इच्छुकांवर अन्याय

ठळक मुद्देगेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती.

मुंबई : विशेष सुरक्षा दलात (एसपीयू)मध्ये प्रतिनियुक्तीसाठी निश्चित केलेल्या मनुष्यबळाहून अधिकजण कार्यरत असतानाही पुन्हा तेथीलच जवानांना पाचारण करण्याचा अजब प्रकार घडला आहे. राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) नवी मुंबई ( गट क्रमांक ११) येथील आठ जवानांना पुन्हा प्रतिनियुक्तीसाठी निवड करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एसआरपीच्या अप्पर महासंचालकांनी सूचना करुनही एसपीयूच्या अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या अन्य पात्र इच्छुकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अति महत्वाच्या व्यक्ती, सत्ताधारी, राजकारणांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘एसपीयु’कडून अंगरक्षक (बॉडीगार्ड) पुरविले जातात. त्यांना असलेला धोका आणि त्याचे महत्वपाहून त्यासाठी बॉडीगार्डची निश्चिती केली जात असून विविध पोलीस घटकातील अंमलदार, अधिकाऱ्यांची पाच वर्षासाठी प्रतिनियुक्ती केली जाते. संबंधितांना नियमित वेतनाहून ३० टक्के अधिक अधिक भत्ता दिला जातो, त्याशिवाय २४ तास ड्युटीनंतर २४ तासाची ‘ऑफ’ मिळतो. त्यामुळे त्याठिकाणी प्रतिनियुक्तीसाठी अनेकजण इच्छुक असतात. एसपीयूकडून बऱ्याच वर्षानंतर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये पुण्यात एसआरपीच्या मैदानावर शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्याबाबतचा निकाल जाहीर करण्यास विलंब लावण्यात आला. ‘लोकमत’नेही ही बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी विशेष शाखेतील ५ वर्षाहून अधिक कालावधीत पुर्ण झालेल्या काहीजणांना परत पाठविण्यात आले होते. त्यानंतर अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी १० जानेवारीला एसआरपीच्या विविध गटातील २९ जणांना प्रतिनियुक्तीसाठी निवड केली आहे. त्यामध्ये नवी मुंबईच्या पथकातील ८ जणांचा समावेश आहे. वास्तविक एसपीयूसाठी या पथकातील १११ मंजूर पदे असताना १३०जण कार्यरत आहेत. तरीही आणखी आठजणांना पाचारण केले आहे. त्याउलट अन्य पथकातील मंजूर पदापेक्षा कमी भरती केली असताना त्यांची निवड करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती. मात्र तरीही विशेष सुरक्षा शाखेच्या प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे अन्य इच्छुक पात्र जवानावर अन्याय झालेला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई