शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

'डी-गँगमधून बोलतोय'; माजी नगराध्यक्षांना १० कोटींची खंडणी मागणारे दोघे जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:44 IST

वैजापूरच्या संचेती कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देपाच दिवसांनंतर छडा

वैजापूर : येथील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांना दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनीअटक केली. यातील एक जण शहरात मोबाईल शॉपी चालविणारा आहे, तर दुसरा वैजापूरजवळील रोटेगाव येथील रहिवासी आहे. या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मागील पाच दिवसांपासून संपूर्ण शहर पिंजून काढले. शेवटी अजय मोहनसिंग राजपूत (२६, रा.  परदेशीगल्ली, वैजापूर) व राजू ऊर्फ जयराम बागूल (३५, रा. रोटेगाव, ता. वैजापूर) या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा मर्चंटस् बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांना २६ नोव्हेंबर रोजी मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा एक कॉल आला. अज्ञात व्यक्तीने संचेती यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर तुमच्यासह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संचेती कुटुंबातील   सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. २७ नोव्हेंबर रोजी या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. 

मात्र, पोलिसांनी या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती. २८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी शहरातील परदेशी गल्लीतील अजय मोहनसिंग राजपूत व रोटेगाव येथील राजू बागूल या दोघांना  चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तब्बल तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. काल सोमवारी या दोघांनी पोलिसांसमोर तोंड उघडले. आपणच १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी संचेती परिवारास जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली अजय राजपूत याने दिली. याप्रकरणी अजय राजपूत व राजू बागूल या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना वैजापूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

मास्टर माइंड अजय राजपूतच या प्रकरणात अजय राजपूत हाच मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. धमकी देण्यासाठी व खंडणी मागण्यासाठी राजेंद्र बागूलचा मोबाईल हॅण्डसेट वापरण्यात आला होता. अजय हा जुगार-मटक्यामध्ये २२ लाख रुपये हरल्यामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. हरलेल्या पैशाच्या भरपाईसाठी अजयने हा खंडणी उकळण्याचा कट रचला होता. 

सहा सीमकार्डांचा वापरस्टेशन रस्त्यावरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याशेजारी अजय राजपूत याची आर्यन मोबाईल शॉपी आहे. अजयला मोबाईलचे बरेच तंत्रज्ञान अवगत आहे. त्याने व्हॉईस चेंजरबरोबरच व्हॉटस्अ‍ॅपसारख्या सोशल साईटचाही वापर केला. पोलिसांना मोबाईलचे लोकेशन हे सतत परदेशी गल्लीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व लक्ष्मी चित्रपटगृहाजवळच मिळत होते. 

तत्पूर्वी झाला चतुर्भुज१२ डिसेंबर रोजी अजय हा विवाह बंधनात अडकणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला खंडणी मागणे व जिवे मारण्याची धमकी देणे, या प्रकरणात बेड्या ठोकल्या. पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणतीही पातळी गाठू शकतो, हे या खंडणी प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. 

२७ नोव्हेंबरपर्यंतची मुदतअजयने २६ नोव्हेंबर रोजी संचेती यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून खंडणीची मागणी केली होती. त्याने संचेती यांना २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर संचेती यांच्या निवासस्थानी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त  होता. मोबाईलचे दुकान संचेती यांच्या आॅफिससमोरच असल्याने अजय व राजू हे दोघे जण बाळासाहेब संचेती यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे दोघे जण सतत पोलीस ठाण्यासमोर चकराही मारत असत. या प्रकरणात आरोपींना सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या घटनेचे वाईट वाटलेअनपेक्षितपणे मोबाईलवर खंडणी मागणारा फोन आला. त्यामुळे आमच्या कुटुंबावर भीतीची छाया पसरली. पोलिसांनी अथक परिश्रम घेत चार दिवसांतच आरोपीला गजाआड केले. वैजापुरात सर्व जाती-धर्माच्या लोकांसोबत आपले स्नेहाचे संबंध आहेत. आरोपींनी हा पवित्रा का उचलला, याचे वाईट वाटले. यापूर्वी त्यांच्यासोबत आपला कसलाही संबंध आला नव्हता. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.- बाळासाहेब संचेती

गुप्तता पाळल्याने आरोपींपर्यंत पोहोचता आलेवैजापूर येथील व्यावसायिकाला डी-गँगच्या नावाने कॉल करून खंडणी मागणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सायबर सेल आणि पारंपरिक तपासाची उत्तम सांगड घातल्याने हायप्रोफाईल गुन्ह्याचा उलगडा करण्यात आम्हाला यश आले. या प्रकरणाचा तपास करताना गुप्तता पाळण्यात आल्याने आरोपीपर्यंत पोहोचता आले. खंडणी मागण्यासाठी आरोपी राजपूतला चोरीचा मोबाईल देणाऱ्यालाही आरोपी करण्यात आले.  -मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

पोलिसांना कळवावेवैजापूरच्या व्यावसायिकाला दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणारे कॉल आले. यानंतर सर्वप्रथम तक्रारदार कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, वैजापूर पोलीस ठाणे आणि सायबर क्राईम सेल यांनी संयुक्त कारवाई करून आरोपींना पकडले. अशा प्रकारे खंडणीचे कॉल आल्यानंतर न घाबरता तात्काळ पोलिसांना कळवावे. -गणेश गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक