शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

बलिया गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी धीरेंद्र सिंगने आत्मसमर्पणासाठी केला कोर्टात अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 21:58 IST

Ballia Firing : आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यामध्ये धीरेंद्र सिंगचा भाऊ आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती पोलिस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात सरकारी कोट्याच्या दुकानात गोळ्या घालून जय प्रकाश उर्फ गमा पाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी डीआयजी आजमगड रेंजने ५०-५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बलिया: बलिया (यूपी) प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंग यांनी बलिया कोर्टात शरणागतीचा अर्ज दिला आहे. आरोपीने स्थानिक न्यायालयात “सरेंडर अर्ज” दाखल केला आहे. अशा अर्जामुळे आरोपीला संबंधित कोर्टासमोर थेट आत्मसमर्पण करण्याची परवानगी मिळते, त्यानंतर त्याला पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत पाठवायचे की नाही हे ठरवले जाते. आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यामध्ये धीरेंद्र सिंगचा भाऊ आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धीरेंद्र सिंग आणि अन्य पाच जण सध्या फरार आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती पोलिस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात सरकारी कोट्याच्या दुकानात गोळ्या घालून जय प्रकाश उर्फ गमा पाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी डीआयजी आजमगड रेंजने ५०-५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. एसपी बलिया यांनी फरार आरोपींना यापूर्वी 25-25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दुर्जनपूर खेड्यात स्वयंसहायता गटांच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांच्या वाटपासाठीच्या या बैठकीचे कामकाज थांबवल्यानंतर जय प्रकाश यांची हत्या झाली. भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांचा धीरेंद्र सिंह हा भाऊ आहे. सुरेंद्र सिंह यांनी भावाला पाठीशी घालताना म्हटले की, ‘जर त्याने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली नसती, तर त्याच्या कुटुंबातील डझनभर सदस्य आणि सहकारी ठार मारले गेले असते.’ पोलीस प्रशासनाने आमच्या बाजूने प्रथमदर्शनी ‘हलगर्जीपणा’ झाल्याचे मान्य करून रेवती पोलीस ठाण्याचे तीन उपनिरीक्षक आणि सहा कॉन्स्टेबल्सना निलंबित केले आहे.आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्रनरेंद्र प्रतापसिंह यांच्यासह त्यांचा भाऊ व २२-२५ अज्ञात लोकांची नावे प्रथमदर्शनी अहवालात नोंदवण्यात आली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत, असे जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. मुख्य आरोपी फरार आहे. घटनास्थळी दहा पोलीस कर्मचारी होते. ते गुन्हेगारांना वाचवत होते व आम्हाला मारहाण करीत होते. धीरेंद्र प्रताप सिंह हा गोळीबारानंतर पळून गेला व पोलिसांनी त्याला पकडले; परंतु त्यांनी त्याला जवळच्या बंधाºयावर नेऊन सोडून दिले, असे जय प्रकाश पालचे भाऊ तेज प्रताप पाल यांनी शुक्रवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले होते.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश