शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपायुक्तांची धडाकेबाज कारवाई; एका टोळीच्या सात सदस्यांना तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2022 17:54 IST

आगामी गणेशोत्सव सणानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे

मंगेश कराळे

नालासोपारा - शहरातील तुळींज, आचोळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी गोळा करणे, सरकारी कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, पैश्यासाठी अपहरण करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणाऱ्या एका टोळीच्या सात सदस्यांना शुक्रवारी संध्याकाळी उशिरा परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. एकाच दिवशी सात जणांना तडीपार केल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.

आगामी गणेशोत्सव सणानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील परिसरात हे सात आरोपी कधी एकत्र टोळी करून गुन्हे करायचे तर कधी एकटे एकटे. या टोळीतील युवकांविरुध्द तुळींजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होऊन या गुंडांच्या टोळीस पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये टोळीचा प्रमुख शुभम उर्फ बाबा मिश्रा, टोळी सदस्य संजय उर्फ मुन्नी सिंग, सत्यम उर्फ आदर्श रॉय, देव सिंग उर्फ भीम, अभिषेक शर्मा, सूरज सिंग उर्फ कबाडे आणि लवकुश पांडे यांचा समावेश आहे.’या टोळीतील युवकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव सुरूच होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे तुळींज आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणुन त्यांच्यावर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे.

कोट

एका टोळीच्या सात सदस्यांना पोलीस उपायुक्तांनी शुक्रवारी रात्री तडीपार करण्यात आले आहे. या सातही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. - राजेंद्र कांबळे (पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)