शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 2:43 PM

Delhi voilence : या दंगेखोरांनी त्याला मारहाण केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकला, असा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देमंगळवारी संध्याकाळी ते ड्युटीवरून घरी परतत असताना काही लोकांनी चांद बाग पुलाला घेराव घातला.अंकित घरी न पोहोचल्याने कुटुंब अस्वस्थ झाले. मंगळवारपासून अंकितचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते.

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असून या आगडोंबात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.  दिल्लीतील चंदबाग पुलाजवळ वाहणार्‍या नाल्यातून गुप्तचर विभागाच्या (आयबी) पोलीस हवालदाराचा मृतदेह आज दुपारी वाढल्याने खळबळ उडाली. मृत कॉन्स्टेबल अंकित शर्मा खजुरी येथे राहत होते. मंगळवारी संध्याकाळी ते ड्युटीवरून घरी परतत असताना काही लोकांनी चांद बाग पुलाला घेराव घातला. या दंगेखोरांनी त्याला मारहाण केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकला, असा आरोप केला जात आहे.

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

 

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

 

अंकित घरी न पोहोचल्याने कुटुंब अस्वस्थ झाले. मंगळवारपासून अंकितचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते. अंकितचे वडील रवींदर शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. मारहाणीबरोबरच अंकितलाही गोळ्या घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मृत पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात (CAA) मंगळवारी उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आगडोंब उसळला आहे. सोमवारी अनेक घरे, दुकाने आणि अनेक वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक व गोळ्या झाडण्यात आल्या. या हिंसक निदर्शनांमध्ये गोकुळपुरी भागात हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला, तर शाहदराचे डीसीपी अमित शर्मा जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल रत्न लाल हे सहाय्यक उपायुक्त कार्यालयात कार्यरत होते. दरम्यान, डीसीपी शर्मा यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी डीसीपी यांची प्रकृती सुधारली. त्याचवेळी मृत पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन लाल (42) हे एकटेच कुटुंबात पैसे कमावत होते. ते पत्नी आणि तीन मुलांसमवेत बुरारी येथे राहत होते. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhi violenceदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यू