शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सहा आरोपींची फाशीची शिक्षा चक्क नऊ वर्षांनी घेतली मागे! सुप्रीम कोर्टाने चूक सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:17 IST

नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे.

- अजित गोगटेमुंबई  - नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे. आता आरोपींच्या अपिलांवर नव्याने सुनावणी होणार असून, त्याचा निर्णय होईपर्यंत त्यांना फाशी देण्यास स्थगिती दिली आहे.या निर्णयाने अंकुश शिंदे, राज्या शिंदे, अंबादास शिंदे, राजूू शिंदे, बापू शिंदे व सुऱ्या शिंदे यांचा फास तूर्त सैल झाला आहे. हा आदेश न्या. अरिजित पसायत व न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या खंडपीठाने ३० एप्रिल २००९ रोजी दिला. याविरुद्धच्या फेरविचार याचिकाही फेटाळण्यात आल्या. पुढे एका प्रकरणात घटनापीठाने निकाल दिला की, या शिक्षेविरुद्ध फेरविचार याचिकांवर खुल्या कोर्टात सुनावणी घ्यावी. चेंबरमध्ये फेटाळलेल्या याचिकांमधील अशा आरोपींचीही खुली सुनावणी व्हावी.यानुसार आरोपींच्या फेरविचार याचिकांची सुनावणी न्या. कुरियन जोसेफ, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने घेऊन सर्व आरोपींना फाशीचा निकाल मागे घेतला.आधीच्या खंडपीठाकडून तीन आरोपींचा पसंतीचा वकील नेमून बाजू मांडण्याचा हक्क हिरावला गेला होता, हे लक्षात आल्याने चूक सुधारण्यात आली. आरोपींसाठी टी. हरीश कुमार, राहुल कौशिक व गीता कोविलन यांनी तर राज्य सरकारतर्फे निशांत कटनेश्वरकर, सुवर्णा, अनुप कंडराज व दीपा कुलकर्णी यांनी बाजू मांडली.नाशिक सत्र न्यायालयाने सर्वांना १२ जून २००६ रोजी फाशी ठोठावली. उच्च न्यायालयाने २२ मार्च २००७ रोजी अपिलात अंकुश, राज्या व राजू यांंची फाशी कायम केली व इतरांना जन्मठेप दिली. फाशी झालेल्यांनी अपिले केली व इतर तिघांनाही फाशी व्हावी यासाठी राज्य सरकारने अपिले केली.सरकारच्या अपिलांची नोटीस अंकुश, राज्या व राजू या आरोपींवर बजावली गेली. मात्र न्या. पसायत व न्या. शर्मा यांच्या खंडपीठाने दोन दिवस सुनावणी आधी घेतली. नोटीस काढूनही तिघांसाठी कोणीच हजर न राहिल्याने खंडपीठाने अन्य तिघांचे अ‍ॅड. सुशील करंजकर यांनाच त्यांच्या वतीनेही युक्तिवाद करण्यास सांगितले. सर्व अपिले संबंधित व तथ्येही सारखीच असल्याने फाशीचा निकाल तीन नव्हे, तर सर्व आरोपींसाठी आताच्या खंडपीठाने मागे घेतला आहे.घातला दरोडा; बलात्कार व हत्याही केलीबेलटगवाण (ता. नाशिक) शिवारातील रघुनाथ हगवणे यांची बाग त्र्यंबक सतोटे कसत होते. ते बागेतील घरात राहायचे. आरोपींनी ५ जून २००३ ला घरावर दरोडा टाकला. चीजवस्तू लुटण्याखेरीज त्यांनी त्र्यंबक, त्यांचे दोन मुलगे संदीप व श्रीकांत आणि पाहुणा भारत मोरे यांचे खून केले. त्यांनी त्र्यंबक यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून ठार मारले. दरोड्यात त्र्यंबक यांची पत्नी व एक मुलगाही जखमी झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी