शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सहा आरोपींची फाशीची शिक्षा चक्क नऊ वर्षांनी घेतली मागे! सुप्रीम कोर्टाने चूक सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:17 IST

नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे.

- अजित गोगटेमुंबई  - नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे. आता आरोपींच्या अपिलांवर नव्याने सुनावणी होणार असून, त्याचा निर्णय होईपर्यंत त्यांना फाशी देण्यास स्थगिती दिली आहे.या निर्णयाने अंकुश शिंदे, राज्या शिंदे, अंबादास शिंदे, राजूू शिंदे, बापू शिंदे व सुऱ्या शिंदे यांचा फास तूर्त सैल झाला आहे. हा आदेश न्या. अरिजित पसायत व न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या खंडपीठाने ३० एप्रिल २००९ रोजी दिला. याविरुद्धच्या फेरविचार याचिकाही फेटाळण्यात आल्या. पुढे एका प्रकरणात घटनापीठाने निकाल दिला की, या शिक्षेविरुद्ध फेरविचार याचिकांवर खुल्या कोर्टात सुनावणी घ्यावी. चेंबरमध्ये फेटाळलेल्या याचिकांमधील अशा आरोपींचीही खुली सुनावणी व्हावी.यानुसार आरोपींच्या फेरविचार याचिकांची सुनावणी न्या. कुरियन जोसेफ, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने घेऊन सर्व आरोपींना फाशीचा निकाल मागे घेतला.आधीच्या खंडपीठाकडून तीन आरोपींचा पसंतीचा वकील नेमून बाजू मांडण्याचा हक्क हिरावला गेला होता, हे लक्षात आल्याने चूक सुधारण्यात आली. आरोपींसाठी टी. हरीश कुमार, राहुल कौशिक व गीता कोविलन यांनी तर राज्य सरकारतर्फे निशांत कटनेश्वरकर, सुवर्णा, अनुप कंडराज व दीपा कुलकर्णी यांनी बाजू मांडली.नाशिक सत्र न्यायालयाने सर्वांना १२ जून २००६ रोजी फाशी ठोठावली. उच्च न्यायालयाने २२ मार्च २००७ रोजी अपिलात अंकुश, राज्या व राजू यांंची फाशी कायम केली व इतरांना जन्मठेप दिली. फाशी झालेल्यांनी अपिले केली व इतर तिघांनाही फाशी व्हावी यासाठी राज्य सरकारने अपिले केली.सरकारच्या अपिलांची नोटीस अंकुश, राज्या व राजू या आरोपींवर बजावली गेली. मात्र न्या. पसायत व न्या. शर्मा यांच्या खंडपीठाने दोन दिवस सुनावणी आधी घेतली. नोटीस काढूनही तिघांसाठी कोणीच हजर न राहिल्याने खंडपीठाने अन्य तिघांचे अ‍ॅड. सुशील करंजकर यांनाच त्यांच्या वतीनेही युक्तिवाद करण्यास सांगितले. सर्व अपिले संबंधित व तथ्येही सारखीच असल्याने फाशीचा निकाल तीन नव्हे, तर सर्व आरोपींसाठी आताच्या खंडपीठाने मागे घेतला आहे.घातला दरोडा; बलात्कार व हत्याही केलीबेलटगवाण (ता. नाशिक) शिवारातील रघुनाथ हगवणे यांची बाग त्र्यंबक सतोटे कसत होते. ते बागेतील घरात राहायचे. आरोपींनी ५ जून २००३ ला घरावर दरोडा टाकला. चीजवस्तू लुटण्याखेरीज त्यांनी त्र्यंबक, त्यांचे दोन मुलगे संदीप व श्रीकांत आणि पाहुणा भारत मोरे यांचे खून केले. त्यांनी त्र्यंबक यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून ठार मारले. दरोड्यात त्र्यंबक यांची पत्नी व एक मुलगाही जखमी झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी