शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

बापरे! देशात ३० वर्षांत नक्षलवाद्यांकडून ५ हजारांवर आदिवासींची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 7:47 PM

5 thousand Adivasi murdered by naxalist in 30 yrs : पोलीस विभागाची माहिती, ग्रामसभेकडून वसूल करतात खंडणी

ठळक मुद्देनक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत.

गडचिरोली : ‘सत्ता ही बंदुकीच्या नळीतून हस्तगत होते’, या माओच्या तत्त्वानुसार काम करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गेल्या ३० वर्षांत देशभरात पाच हजारांवर आदिवासींची निर्घृण हत्या करून त्यांच्यात दहशत निर्माण केली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात मंगेझरी, मुरमुरी आणि जांभूळखेडा अशा विविध ठिकाणी त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात अनेक पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. असे असताना नक्षलवादी मानवाधिकारावर कोणत्या तोंडाने बोलत आहेत, असा सवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक (जनसंपर्क) डॉ. निलाभ रोहन यांनी उपस्थित केला आहे. नक्षलवाद्यांकडून सध्या पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांबाबत अपप्रचार करणारी पत्रके प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहन यांनी सदर पत्रक प्रसिद्धी माध्यमांना पाठवून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी पोलीस विभागाकडून काय प्रयत्न केले जात आहेत, आणि नक्षलवादी कसे आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे आणत आहेत, याची माहिती दिली. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित आहे. संविधानाच्या आधारेच स्थानिक आदिवासी नागरिकांना ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र त्याच ग्रामसभेकडून नक्षलवादी जबरदस्तीने खंडणी वसूल करतात, अशीही माहिती सदर पत्रकात देण्यात आली.

नक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घाबरून गेलेल्या नक्षलवाद्यांची मन:स्थिती बिघडली आहे. त्यातूनच ते पोलीस जवानांबाबत अपप्रचार करणारे तथ्यहीन पत्रकं प्रसारित करत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या कृतीबद्दल नागरिकांनी नक्षलवाद्यांचा निषेध करून सी-६० पथकातील जवानांचे अभिनंदन करावे, असे आवाहनही डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस