खळबळजनक! स्वर्गात जाणार की नरकात? आधी गुगलवर सर्च केलं नंतर कुटुंबालाच संपवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:22 IST2022-11-08T16:14:37+5:302022-11-08T16:22:23+5:30
Crime News : तरुणाने हत्या करण्याच्या पद्धती आणि त्याचे परिणाम याबद्दल गुगलवर सर्च केलं होतं.

फोटो - आजतक
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनास पाठवले. तरुणाने हत्या करण्याच्या पद्धती आणि त्याचे परिणाम याबद्दल गुगलवर सर्च केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या लोहावट तहसीलमध्ये पीलवा गावात ही घटना घडली. शंकर विश्नोई असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 38 वर्षे आहे. त्याने भाऊ, आई, वडील, दोन मुलांची हत्या केली. शंकर त्याच्या कुटुंबासह शेतात राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अमली पदार्थांचं सेवन करायचा. त्यामुळे त्याचं कुटुंब त्रासलं होतं.
लोहावट पोलीस ठाण्याचे अधिकारी बद्री प्रसाद मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन नोव्हेंबरच्या रात्री शंकरने संपूर्ण कुटुंबाला लिंबू सरबतामधून झोपेच्या गोळ्या दिल्या. या औषधांचा परिणाम काही वेळेत दिसू लागला. सर्वजण बेशुद्ध पडले. त्यानंतर शंकरने वडिलांची हत्या केली. त्यांचं नाव सोनाराम होतं. घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात ते झोपलेले होते. आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
वडिलांना संपवून शंकर घरात आला. त्यानंतर त्याने आईची हत्या केली. 12 वर्षांच्या मुलाला कुऱ्हाडीचे वार करुन संपवलं. या दोघांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकले. शंकरचा लहान मुलगा पत्नीच्या शेजारी झोपला होता. शंकरनं पहाटे पाच वाजता त्याला उठवलं. तितक्यात बायको झोपेतून उठली. मुलाला कुठे घेऊन जाताय अशी विचारणा तिने केली. यानंतर शंकरने लहान मुलाची हत्या केली. त्यालाही पाण्याच्या टाकीत टाकलं. यानंतर त्याने मामाच्या शेतात जाऊन आत्महत्या केली.
आरोपीने पत्नीवर हल्ला केला नाही. शंकरला 2 नोव्हेंबरलाच कुटुंबाला संपवायचं होतं. मात्र झोपेच्या गोळ्यांनी अपेक्षित परिणाम साधला नाही. त्यानंतर 3 नोव्हेंबरला त्यानs लिंबू सरबतामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. आरोपी महिन्याभरापासून हत्येचा कट रचत होता. त्यासाठीच्या पद्धती त्याने गुगलवर शोधल्या. हत्या केल्यानंतर आपण स्वर्गात जाणार की नरकात याबद्दलही त्याने सर्च केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.