शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Crime News: शेजाऱ्यांचा काटा काढण्यासाठी रचला हत्येचा कट, पण डाव उलटला आणि हातात पडल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:01 IST

Crime News: जमिनीच्या वादातमधून शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी एका महिलेने तिच्याच बहिणीच्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट आखला. तसेच त्यामध्ये  तिने तिची आई, भाऊ यांच्याबरोबरच तिच्या पतीलाही सभागी करून घेतले.

देहराडून - जमिनीच्या वादातमधून शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी एका महिलेने तिच्याच बहिणीच्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट आखला. तसेच त्यामध्ये  तिने तिची आई, भाऊ यांच्याबरोबरच तिच्या पतीलाही सभागी करून घेतले. या कटांतर्गत तिने आई आणि भावासोबतच बहीण आणि तिच्या पतीलाही सहभागी करून घेतले. बहिणीच्या सासऱ्याला बोलावण्यात आले. तसेच भाड्याच्या मारेकऱ्यांकडून त्याची हत्याही करण्यात आली. त्यानंतर सरपंचासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद दिसल्याने त्यांनी अधिक पडताळणी केली, त्यामधून या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणी मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

नानकमत्ताच्या ध्यानपूर गावामध्ये ९ नोव्हेंबर रोजी रात्री सुनेच्या घरी आलेल्या जगीर सिंह यांची घरातील अंगणामध्ये झोपले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रजविंदर आणि मोठी बहीण लविंद्र हिने गावातील सरपंच समर सिंह, बलविंद्र, लखविंदर, द्वारिका, सुंदर, जिंतेंद्र आणि धर्मेंद्र यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता. समजले की, हा गुन्हा घडला तेव्हा. सर्व आरोपी आपापल्या घरामध्ये होते. तेव्हा पोलिसांनी तक्रारकर्त्यांचीच उलट तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य कारस्थानकर्ती लविंद्र, तिची आई गुरदीप, भाऊ सूरज, बहीण राजविंदर, जावई कुलवंत आणि शूटर जसवंत सिंह यांना अटक केली.

या हत्येसाठी आरोपींनी जसवंत सिंह यांना ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यामधील १५ हजार रुपये अॅडव्हान्समध्ये दिले गेले. तसेच उर्वरित रक्कम ही काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र हा सर्व डाव उलटला. पोलिसांनी १२ बोअरची बंदूकीसह अॅडव्हानमध्ये सुपारीसाठी दिलेली रक्कम जप्त केली.

या हत्याकांडामध्ये मृताचा मुलगा कुलवंत हासुद्धा सहभागी होता. एका कारस्थानांतर्गत ८ दिवसांपूर्वी कुलवंत याने त्याचे वडील जागीर यांना सासरवाडीस नेऊन सोडले होते. जागीर यांना मद्यपानाचे व्यसन होते. त्याचदरम्यान, हे हत्याकांड घडले त्या रात्री त्यांना दारू पाजण्यात आली, तसेच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी लविंद्र हिचा शेजाऱ्यांसोबत जमिनीचा वाद होता. गेल्या महिन्यामध्ये शेजाऱ्यांनी वादावरून लविंद्र आणि तिच्या शेजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे शेजाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी लविंद्र यांनी कारस्थान रचले, तसेच स्वत: यामध्ये अडकून कुटुंबीयांसह गजाआड गेली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारPoliceपोलिस